शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षाच्या मुलाची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:16 IST

कोतूळ : सध्या राज्यभर ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि योग्य उपचार न मिळाल्याने अनेक कोरोना रुग्ण दगावत आहेत. कोतूळ ग्रामीण रुग्णालयात ...

कोतूळ : सध्या राज्यभर ऑक्सिजन, रेमडेसिविर आणि योग्य उपचार न मिळाल्याने अनेक कोरोना रुग्ण दगावत आहेत. कोतूळ ग्रामीण रुग्णालयात धोकादायक ऑक्सिजन पातळीवरील रुग्ण ऑक्सिजनशिवाय बरे झाले आहेत. ४५ पैकी ४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आठ वर्षाच्या मुलाने कोरोनावर मात केल्याने कोतूळ ग्रामीण रुग्णालय तालुक्यात रोल माॅडेल ठरत आहे.

कोतूळ येथील ग्रामीण रुग्णालयात केवळ २ डाॅक्टर आणि ७ ते ८ कर्मचारी आणि ३० बेडचे कोरोना उपचार केंद्र चालवत आहेत. कर्मचाऱ्यांचा तुटवडा असला तरी आहे, त्यात रुग्णांची काळजी योग्य उपचार होत असल्याने आर्थिक स्थिती चांगली असलेले व्यापारी, सरकारी नोकर इथेच उपचार घेत आहेत.

कोतूळ येथील ग्रामीण रुग्णालयात पंधरा दिवसांपूर्वी कोरोना उपचार केंद्र सुरू झाले. तीस खाटांची क्षमता असलल्या या रुग्णालयात ऑक्सिजन बेड नाही. परिसरात मोठे खासगी हाॅस्पिटल नसल्याने आदिवासी व गोरगरिबांना हे एकमेव उपचार केंद्र आहे.

कोतूळ केंद्रात चाळीस गावांत पंधरा दिवसांपासून सरासरी पंधरा रुग्ण पाॅझिटिव्ह निघतात. काही शहरात खासगीत तर काही गावातील विलगीकरण कक्षात उपचार घेतात.

यातील मध्यम तीव्रतेचे रुग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतात बेड, पंखे, एकवेळ नास्ता, दोन वेळा जेवण दिले जाते.

डाॅ. कृष्णा वानखेडे, डाॅ. मंजुशा तागड हे उपचार करत आहेत. कोतूळ ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड नसताना ८० ते ८५ ऑक्सिजन पातळी असलेले बारा रुग्ण पूर्ण बरे झाले. २० सौम्य रुग्ण बरे झाले. बाकी रुग्ण ८ ते १० रुग्ण दोन दिवसांत घरी जाणार आहेत. अपवाद म्हणून केवळ दोन ८० वर्षे वयाच्या वृध्दांची ऑक्सिजन पातळी तीसपर्यंत आल्याने ते दगावले.

कर्मचारी सुशील धोत्रे, सर्जेराव खंडागळे, संजय बचाटे, विकास वनवे, संदीप पठारे, ए. के. देठे, सुनील पवार, स्वप्नील राक्षे हे रुग्णांवर उपचार करत आहेत.

.............

इथे येणारा प्रत्येक रुग्ण अत्यंत गरीब कुटुंबातील असतो. आम्ही त्याची स्थिती पाहून इथेच उपचार करतो. वेळेत औषधोपचार, गरजेनुसार इंजेक्शन, जेवण, स्वच्छता या बाबींची काळजी घेतो त्यामुळे लवकर रुग्ण बरे होतात. -

डाॅ. मंजुषा तागड, वैद्यकीय अधिकारी

............

कोतूळ परिसरात प्रदूषण पातळी खूप कमी आहे. शिवाय परिसरात निसर्ग व जंगलात वृक्ष असल्याने हवा शुद्ध राहते अशी हवा रुग्ण बरे व्हायला फायदेशीर ठरते. ८० ते ८२ प्राणवायू पातळी असलेले बारा रुग्ण बरे झाले. एका आठ वर्षाच्या मुलाची काळजी घेत ऑक्सिजन, व्हेंटिलेटर शिवाय कोरोमुक्त केले, याचा आनंद आहे.

- डाॅ. कृष्णा वानखेडे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी