शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पिताय ना, मग काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST

---------- लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : पावसाळा सुरू असल्याने दूषित पाणीपुरवठा होण्याचे प्रमाण वाढले आहे. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टाईफाईड, ...

----------

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : पावसाळा सुरू असल्याने दूषित पाणीपुरवठा होण्याचे प्रमाण वाढले आहे. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टाईफाईड, कावीळ, उलटी जुलाब, यासारखे आजार होत असून, पोटदुखीच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.

शहराला मुळा धरणातून पाणीपुरवठा होता. पावसामुळे धरणात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. तसेच शहरातही गेल्या आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे दूषित पाण्याचा पुरवठा होऊन पोटदुखीच्या आजारांमध्ये वाढ होऊ लागली आहे. पाणी पिताना काळजी घेणे गरजेचे असून, पाणी गाळून, उकळून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

....

दूषित पाण्यामुळे होणारे आजार

दूषित पाणी पिल्याने गॅस्ट्रो, टाईफाईड, कावीळ,जुलाब होणे, यासारखे आजार होतात. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. परंतु, साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

.....

आजाराची लक्षणे काय?

- पोट गडगडणे

- ताप येणे

- जुलाब होणे

- पोटात दुखणे

.....

पाणी उकळून प्यायलले बरे

दूषित पाणीपुरवठा होत असल्याने स्वच्छता ठेवणे गरजेचे आहेत. तसेच पाणी गाळून व उकळून पिणे आवश्यक आहे. पाणी उकळून थंड करून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

...

नगर पितात दररोज ५५ एमएलडी पाणी

नगर शहराला दररोज ५५ एमएलडी पाणी पितात. मुळा धरणातून दररोज ५५ एमएलडी पाणीपुरवठा होतो. धरणात नवीन पाणी आल्याने काही प्रमाणात दूषित पाण्याचा पुरवठा होत असून, पाणी गाळून व उकळून पिणे आवश्यक आहे.

...

- पावसामुळे दूषित पाणीपुरवठा होत आहे. दूषित पाणी येत असल्यास पाणी गाळून व उकळून प्यावे. तसेच उघड्यावरचे खाणे टाळावे. पाणी पिताना काळजी घेतल्यास पोटदुखीसारखे आजार होणार नाहीत.

- डॉ. सतीश राजूरकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी