शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभाग, कृषी विद्यापीठ, महाबीज यांच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:16 IST

संयुक्त कामगिरीमुळे शेतकऱ्यांचा फायदा राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले वाण देशातील शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत. विद्यापीठाने विकसित ...

संयुक्त कामगिरीमुळे शेतकऱ्यांचा फायदा

राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले वाण देशातील शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत. विद्यापीठाने विकसित केलेल्या आठ पिकांच्या वाणांमुळे शेतकऱ्यांना आत्तापर्यंत १ लाख कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. दरवर्षी विद्यापीठ विकसित वाणांपासून सहा हजार कोटींचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत आहे. यापुढे कृषी विभाग, कृषी विद्यापीठे आणि महाबीज यांनी एकत्र येऊन कृषी माल विपणनावर काम करणे गरजेचे आहे, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांनी सांगितले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगामासाठीच्या विभागीय कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समिती बैठकीचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी पाटील बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार उपस्थित होते. याप्रसंगी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक राहुल रेखावाल, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक शरद गडाख, अधिष्ठाता (कृषी) अशोक फरांदे, कृषी परिषदेचे विस्तार शिक्षण संचालक विठ्ठल शिर्के उपस्थित होते.

कृषी आयुक्त धीरज कुमार म्हणाले, यावर्षी पावसाचा चांगला अनुमान आहे. या पावसाचा फायदा घेण्यासाठी कृषी विज्ञान व तंत्रज्ञान याची जोड देणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांची जमीनधारणा कमी होत आहे. शेती फायदेशीर करायची असेल तर पीक निविष्ठांवरील खर्च कमी करणे, छोट्या शेतकऱ्यांना परवडेल, अशा यंत्र सामुग्रीची निर्मिती करणे गरजेचे आहे.

महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक राहुल रेखावाल म्हणाले, आंतर संस्थात्मक सहभागावर भर दिल्यामुळे खरीप हंगामातील विविध पिकांच्या बिजोत्पादनात वाढ होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. याप्रसंगी संशोधन व विस्तार शिक्षण संचालक शरद गडाख यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले वाण व शिफारशी आणि विस्तार उपक्रमांचे सादरीकरण केले. यावेळी मिलिंद देशमुख, पंकज पाटील, अजय कुचे यांनीही विविध विषयांवर मार्गदर्शन केले. विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, कोल्हापूरचे विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, नाशिकचे विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ यांनी विभागीय खरीप अहवालाचे सादरीकरण केले. स्वागत पंडित खर्डे यांनी केले. भगवान देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. आभार गोकुळ वामन यांनी मानले.