शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींकडून देशाची दिशाभूल

By admin | Updated: October 6, 2014 23:56 IST

श्रीरामपूर/शेवगाव : राज्य तोडण्याची इच्छा बाळगून असणाऱ्यांच्या हाती सत्ता देणार का, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

श्रीरामपूर/शेवगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करतानाच राज्य तोडण्याची इच्छा बाळगून असणाऱ्यांच्या हाती सत्ता देणार का, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीरामपूर व शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील सभेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या मोदी सरकारच्या काळात ऊस, कापूस, डाळिंब, कांद्याच्या भावात घसरण झाली. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या मोदींचे हेच का अच्छे दिन आहेत? महाराष्ट्रात ग्रामस्वच्छता अभियानातून स्वच्छतेचे महत्त्व देशाला समजावून सांगितले. आता तेच मोदी स्वच्छ भारतचा नारा देऊन मार्केटिंग करुन छुपा अजेंडा राबवित आहेत. मार्केटिंगच्या माध्यमातून देशाची दिशाभूल करीत आहेत. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी अखंड महाराष्ट्रासाठी संघर्ष केला. पण आज मोदींना देशाच्या पंतप्रधान पदावर बसविणारेच महाराष्ट्र तोडायला निघाले आहेत. राज्याचे तुकडे पाडायचा विचार ही मंडळी करीत आहेत. महाराष्ट्र तोडणारांच्या हाती राज्य देणार का? राष्ट्रवादीचे सरकार आल्यास आमचे निर्णय दिल्लीतून नाही तर मुंबईतच होतील. शेतीचे, पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी, गतिमान, पारदर्शक, लोकाभिमुख व दर्जेदार काम करणारे सरकार आणण्यासाठी राष्ट्रवादीला मते द्या. आपण उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना वैयक्तिक स्वार्थासाठी काही केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आल्यास पहिल्या १०० दिवसात टोलमुक्त महाराष्ट्र करून एल. बी. टी. प्रश्न सोडवून दाखवू, असे सांगत अहमदनगर जिल्ह्यात आमदार चंद्रशेखर घुले व शंकरराव गडाख सोडल्यास पक्षाने सर्व नवी टीम मैदानात उतरविल्याचे पवार म्हणाले. बोधेगावच्या सभेत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, माजी आमदार नरेंद्र घुले यांची भाषणे झाली. श्रीरामपूरच्या सभेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग, घनश्याम शेलार, उमेदवार गायकवाड यांची भाषणे झाली. या सभांना उमेदवार आ.चंद्रशेखर घुले, उमेदवार सुनीता गायकवाड व शिर्डीचे उमेदवार शेखर बोऱ्हाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)