शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
4
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
5
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
6
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
7
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
8
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
9
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
10
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
11
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
12
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
13
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
14
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
15
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
16
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
17
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
18
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
19
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
20
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमुळेच शेतकऱ्यांना सव्वा कोटी विमा

By admin | Updated: June 15, 2016 23:44 IST

लोणी : नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कॉँग्रेस आघाडी सरकारनेच हवामानावर आधारित पीक विमा योजना सुरू केली.

लोणी : नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कॉँग्रेस आघाडी सरकारनेच हवामानावर आधारित पीक विमा योजना सुरू केली. या योजनेची व्याप्ती आपण कृषिमंत्री असताना वाढविल्यामुळेच दोन वर्षांत सव्वा कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाल्याचे समाधान आहे, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले.
प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात राधाकृष्ण विखे यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त जलक्रांती अभियानाचा लोकार्पण सोहळा आणि कार्यकर्त्यांना ५ रोपे देवून वनक्रांती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.विविध योजनांच्या लाभार्थींना प्रमाणपत्र, कृषी औजारे आणि इतर साहित्यांचे वाटप केले. शिर्डी मतदारसंघातील मोफत अपघात विमा योजनेतील लाभार्थींना धनादेशाचे वितरण यावेळी केले. दुष्काळी पार्श्वभूमीवर वाढदिवसाचा सत्कार विखे यांनी स्वीकारला नाही. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी जि. प. अध्यक्षा शालिनी विखे, अण्णासाहेब शेलार, डॉ. विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, उपाध्यक्ष पोपटराव लाटे, जि.प.सदस्य डॉ.भास्करराव खर्डे, जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा कांचन मांढरे, प्रवरा बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, बाबासाहेब डांगे उपस्थित होते.
राधाकृष्ण विखे म्हणाले, काँग्रेस आघाडी सरकारने पीक विमा योजना सुरू केली. या विमा योजनेचा सन २०१४ साली ४० लाख व २०१५ साली ८० लाख शेतकऱ्यांना ४५०० कोटी रुपयांचा लाभ मिळाला.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची दिंडी कार्यक्रमस्थळी आली होती़ शेतकऱ्यांनो घाबरु नका, हिमतीने जीवनाला सामोरे जा, असा संदेश या मुलांनी दिला़ (वार्ताहर)
डॉ. सुजय विखे यांनी जलक्रांती अभियानाचे महत्व विषद केले. लोकांच्या सहभागाने यशस्वी झालेले अभियान आता वनक्रांतीच्या माध्यमातून पुढे नेण्याचा आपला विचार आहे. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे यांच्या वाढदिवसानिमित्त या अभियानाचा संकल्प आपण केला होता. आज या अभियानाचा लोकार्पण सोहळा होत असल्याचे मोठे समाधान असल्याचे त्यांनी नमूद केले. या अभियानात सहभागी झालेल्या २० ही गावांतील कार्यकर्त्यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
राज्यात विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करावेच लागते. २९ जिल्ह्यांमधील विविध प्रश्न आणि समस्या आपण जाणून घेतल्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शासनाने दत्तक घ्यावे, ही आपली मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे, अशी माहिती विखे यांनी या कार्यक्रमात दिली़