शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
3
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
4
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
5
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
6
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
7
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
8
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
9
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
10
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
11
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
12
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
13
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
14
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
15
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
16
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
17
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
18
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
19
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
20
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:27 IST

अहमदनगर : पाथर्डी, शेवगाव, नगर तालुक्यासह जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या आजी-माजी ...

अहमदनगर : पाथर्डी, शेवगाव, नगर तालुक्यासह जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या आजी-माजी आमदारांनी जिल्हा प्रशासनाकडे सोमवारी केली. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना दिले.

या वेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री प्रा. राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, वसंत चेडे, अशोक खेडकर, दिलीप भालसिंग, माणिक खेडकर, अंबादास पिसाळ, अनिल लांडगे, वसंत सोनवणे, जिजाऊ लोंढे, बाळासाहेब अकोलकर, मनोज कोकाटे उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पाथर्डी, शेवगाव, नगर तालुक्यासह इतर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकरी, व्यावसायिक, पशुपालक यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकरी व छोटे उद्योग-धंदे करणारे अनेक व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.

पुराचे पाणी तसेच बंधाारे फुटल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना सरसकट ६० हजार एकरी मदत मिळावी. आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग व्हावी. छोटे व्यावसायिक, उद्योग-धंदे करणारे यांच्या दुकानात पाणी शिरल्यामुळे त्यांचा कच्चा माल तसेच किराणा माल निकामी झालेला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने एक लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी. गायी, म्हशी, शेळ्या, कोंबड्या पाळणारे पशुपालक यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना गायी-म्हशीसाठी प्रत्येकी एक लाख रुपये व शेळ्या, कोंबड्यांसाठी दहा हजार रुपये आर्थिक मदत मिळावी.

ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे किंवा पडझड झालेली आहे, घरातील भांडीकुंडी वाहून गेलेली आहेत, अशा नुकसानग्रस्तांना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत मिळावी. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी बुजल्या व शेततळे फुटले, वाहून गेले अशा शेतकऱ्यांना एक लाखाची भरपाई मिळावी. याशिवाय रस्ते दुरुस्ती, वीजपुरवठा, रोहित्रांची दुरुस्ती करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

---------

फोटो- ०६बीजेपी

अतिवृष्टीचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी भाजपच्या आजी-माजी आमदारांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. जिल्हाधिकारी कार्यालयात या वेळी आमदार बबनराव पाचपुते, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले आदी.