शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

दिवसा ढगाळ वातावरण.. रात्री निरभ्र चांदणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:25 IST

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील तिसगावसह पश्चिम भागातील सव्वीस गावांच्या परिसरात सोळा दिवसांपासून पाऊस रुसला आहे. दिवसा ढगाळ वातावरण, रात्री ...

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील तिसगावसह पश्चिम भागातील सव्वीस गावांच्या परिसरात सोळा दिवसांपासून पाऊस रुसला आहे. दिवसा ढगाळ वातावरण, रात्री वारे, निरभ्र चांदणे असे विषम वातावरण आहे. त्यामुळे खरिपातील कपाशी, बाजरी, तूर, भुईमूग पिकांची वाढ खुंटली आहे.

अशा वातावरणामुळे पिकांवर रोग, किडींचा प्रादुर्भावही होत आहे.

शेतकरी भगवान मरकड म्हणाले, डाळिंबावर तेल्याचे अस्मानी संकट कोसळल्याने गर्भगिरी पट्ट्यात उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. या वर्षी ६ जूनलाच पावसाचे आगमन झाले. कमी-अधिक दिवसांच्या अंतराने नऊ वेळेस पाऊस कमी-अधिक बरसला. गत महिन्यातील १८ जुलै अखेर एकूण २५४ मिलीमीटर पाऊस झाला. त्यानंतर पंधरवडा उलटला. नक्षत्रेही बदलली. पाऊस मात्र आला नाही. असे वास्तव चित्र परिसरात प्रथमच अनुभवास येत असल्याने बळीराजा हबकून गेला आहे.

सुसरे, सोमठाणे गाव परिसर तूर, कपाशीचे आगर म्हणून ओळखले जाते. पाऊस, अनुकूल हवामान नसल्याने कपाशी, तूर पीक केवळ वीतभर वाढले आहे. फळशेतीचा बहर फुलण्यासाठी पाऊस गरजेचा असल्याची खंत नवनाथ जगताप यांनी व्यक्त केली.

जवखेडे, आडगाव, कोपरे या बागायती पट्ट्यांत ऊस लागवडीखालील क्षेत्रालाही मोठ्या पावसाची आस लागली आहे. खरीप पिकांनी माना टाकल्यात, असे अमोल गवळी, पोपटराव कराळे म्हणाले.

दिवस - रात्रीच्या विषम हवामानाने शेतीपिके व उत्पादकांचा पुरता बेरंग झाला आहे. पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतित आहे.