शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आता मनपसंत काॅलेज मिळेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:26 IST

अहमदनगर : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) न्यायालयाने रद्द केल्याने आता गुणवत्ता सिद्ध कशी करायची तसेच ...

अहमदनगर : अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) न्यायालयाने रद्द केल्याने आता गुणवत्ता सिद्ध कशी करायची तसेच अकरावीला मनपसंत काॅलेजला प्रवेश मिळेल का? याची चिंता हुशार विद्यार्थ्यांना लागली आहे. दुसरीकडे निकालाची टक्केवारी वाढल्याने दहावीच्या गुणांवरच अकरावीचे प्रवेश देणे शिक्षण विभागासाठी कसरतीचे ठरणार आहे.

शिक्षण विभागाने नियोजित केलेली सीईटी न्यायालयाने रद्द केली आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या गुणांवरच गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. दुसरीकडे अनेक हुशार विद्यार्थी सीईटी रद्द झाल्याने हिरमुसले आहेत. कारण अंतर्गत मूल्यमापनात कमी गुण मिळाल्याची अनेकांची तक्रार आहे. सीईटी झाली असती तर गुणवत्ता सिद्ध करून मनपसंत महाविद्यालयात प्रवेश घेता आला असता, परंतु आता दहावीच्या गुणांवरच अकरावीचे प्रवेश होणार असल्याने ज्यांना कमी गुण मिळाले त्यांच्या मनाला घोर लागला आहे. दुसरीकडे दहावीचा निकाल उच्चांकी लागल्याने प्रवेश देताना महाविद्यालयांनाही कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, शिक्षण संचालनालय कार्यालयाने काढलेल्या पत्रानुसार १४ ऑगस्टपासून अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे.

-------------

दहावी उत्तीर्ण विद्यार्थी - ७०५६६

अकरावीची प्रवेश क्षमता - ७६६००

-------------

कोणत्या शाखेत किती जागा

कला -२९६००

वाणिज्य - १०९७०

विज्ञान - ३४०००

---------

महाविद्यालयांचा कट ऑफ वाढणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत शैक्षणिक वर्षात दहावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे दहावीचे निकाल जाहीर केले. परिणामी, यावर्षी दहावीचा उच्चांकी निकाल लागला असून विद्यार्थ्यांची टक्केवारीही वाढली आहे. त्यामुळे यावर्षी शहरातील प्रमुख महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाचा कट ऑफ वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनेक विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळालेले आहेत.

-------------

शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून एक-दोन दिवसांत अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक प्राप्त होईल. त्यानंतर जिल्ह्यात एकच वेळापत्रक जाहीर करून अकरावी प्रवेशाची प्रक्रिया राबवली जाईल.

- रामदास हराळ, शिक्षणाधिकारी, माध्यमिक

-------------

सीईटी परीक्षा झाली असती तर नामांकित महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता सिद्ध करता आली असती. कारण अंतर्गत मूल्यांकनात कमी गुण मिळाल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. याचा फटका हुशार विद्यार्थ्यांना बसेल. कारण त्यांना आता कुठेच दाद मागता येणार नाही.

- संतोष साळुंके, विद्यार्थी