शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शंभरीच्या उंबरठ्यावरील भंडारदरा धरणाचे होणार मजबुतीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:24 IST

अकोले : ब्रिटिशकालीन भंडारदरा उभारणीस ९५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यावेळी ८४ लाख रुपये खर्चून हे धरण बांधण्यात ...

अकोले : ब्रिटिशकालीन भंडारदरा उभारणीस ९५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यावेळी ८४ लाख रुपये खर्चून हे धरण बांधण्यात आले आहे. १९७३ च्या कालावधीत धरण मजबुतीकरणाची कामे झाली. आता धरणाची शतकी वाटचाल लक्षात घेता धरण पुनर्बांधणी व सुधारणा प्रकल्पांतर्गत धरण मजबूत करण्यासाठी ७३ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

शेती सिंचनासाठी पाट-कालवेनंतर गूळ-चुनाखडी वापरुन दगडात रेखीव भक्कम धरणाची उभारणी करुन साकारलेल्या ‘अर्थर लेक’ मधील पाणीसाठ्याच्या आधारावरच लाभक्षेत्रात बागायत फुलले. १८७५ श्रीरामपूर भागात पाण्यासाठी कालवे झाले. कालव्यांना पाणी मिळावे म्हणून संगमनेर जवळ ओझर येथे १९८५ ला पिकअप वाॅल बांधण्यात आली. आजही येथूनच भंडारदरा पाटपाण्याचे वितरण होते. २३ हजार ७७ हेक्टर सिंचन क्षमतेच्या भंडारदरा धरणाची आधी कालवे मग धरण अशी ख्याती आहे. ओझर उन्नेय बंधाऱ्यापासून पुढे डावा कालवा ७६ व उजवा कालवा ५३ किलोमीटर लांबीचा आहे. १९०५ ला धरणाच्या जागेचे सर्वेक्षण होत १९१० ला धरणाच्या कामास सुरुवात झाली. १९२६ ला दगड-गूळ चुण्यातील या धरणाचे काम पूर्ण झाले. १९२२ ला धरणात पाणी साठवायला सुरुवात झाली असून धरणाचे पाणलोट क्षेत्र १२१ चौरस किलोमीटर इतके आहे. जिल्ह्याला जलसंजीवनी मिळावी म्हणून त्यावेळी साधन सामुग्री फारशी नसतानाही केवळ १६ वर्षांत धरण तयार झाले. धरणाची भिंत २७८ फूट उंच असून केवळ ८४ लाख १४ हजार १८८ रुपये धरणासाठी खर्च झाले आहेत.

१९७३ ला भंडारदरा धरणाच्या भिंतीचे बळकटीकरण करण्यात आले. त्यात १३१ बोअर घेऊन त्यात शिसे ओतण्यात आले असून त्यामुळे ५४० टनाने भिंतीची दाब क्षमता वाढली आहे. तसेच १९४ बोअर घेऊन त्यात प्री स्ट्रेस केबल टाकण्यात आली आहे. केबलचे वजन २१० टन व लांबी १० हजार ५५३ फूट आहे. बळकटीसाठी १४ ‘बटरेस’ बांधण्यात आले आणि ‘स्पिल वे’ गेट बसविण्यात आले. यातून प्रतिसेकंदाला ५३ हजार क्युसेक पुराचे पाणी वाहून जाऊ शकते.

सह्याद्रीचा काळापाषाण ‘बेसॉल्ट’ खडकावर ८५ मीटर उंचीचा ११०३९ दलघफू इतका पाणीसाठा कवेत घेऊन जलमंदिर दिमाखात उभे आहे. स्वीझर्लंड बनावटीचे व्हॉल्व्ह बसवून सिंचन मोऱ्या तयार केलेल्या आहेत. येथील खडकाची दाब सहन करण्याची क्षमता ७ हजार मेट्रिक टन इतकी आहे. बुडीत पाणलोट २१ किलोमीटर लांब असून जवळपास ६० मीटरपर्यंत पाण्याचा दाब असतो. या पाण्याचा ६० टक्के दाब जवळच्या टेकडीवर स्थिरावतो व केवळ ४० टक्के दाब हा भिंतीवर येतो, असे ‘अभियांत्रिकी तंत्र’ धरणासाठी वापरण्यात आले आहे. तर कोकणात पाणी वाहून जाऊ नये म्हणून ब्रिटिशांनी साम्रद जवळ ३५० मीटर लांबीचा ‘सॅडल डॅम’ही बांधला आहे.

.......................

पहिल्या टप्प्यात ७३ कोटींचे काम

सध्या धरण पुनर्स्थापना व सुधारणा प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात ७३ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यात धरण भिंत व सांडवा बळकटीकरण, व्हाॅल्व्ह दुरुस्ती, मूलभूत सुविधा निर्मिती, रस्ते, विद्युतीकरण, यांत्रिकी कामे प्रस्तावित आहेत. राज्याच्या धरण सुरक्षितता संघटना पथकामार्फत केंद्रीय जलआयोग यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. जागतिक बँक व केंद्र शासन यांच्याकडून राज्यांना धरण पुनर्स्थापना व सुधारणा यासाठी निधी दिला जातो. धरण मजबूत करण्याच्या कामास लवकरच सुरुवात होईल असे कार्यकारी अभियंता गणेश न्नानोर व सहायक अभियंता अभिजित देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.