शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:19 IST

कोपरगाव / चांदेकसारे : तालुक्यातील घारी गावातील नागरिकांना ग्रामपंचायतमार्फत आर.ओ.प्लांट बसवून शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. या मागणीसाठी भूमिपुत्र ...

कोपरगाव / चांदेकसारे : तालुक्यातील घारी गावातील नागरिकांना ग्रामपंचायतमार्फत आर.ओ.प्लांट बसवून शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. या मागणीसाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे उत्तर नगर जिल्हा संपर्कप्रमुख किसन विठ्ठल पवार यांनी मंगळवारी (दि.२३) ग्रामपंचायत कार्यालयासमोर सकाळपासून लाक्षणिक उपोषण सुरु केले होते.

या उपोषणाची प्रशासनाने दखल घेत ग्रामसेवक जालिंदर पाडेकर यांनी १५ मे २०२१ पर्यंत गावातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्ते डॉ. गोरक्षनाथ रोकडे यांचे हस्ते लिंबूपाणी घेऊन दुपारी दोन वाजता उपोषण मागे घेतले.

पवार म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून घारी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवावी किंवा आर.ओ. प्लांट बसवावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र, ग्रामपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केले व त्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न केले गेले नाही. नुकतेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने गावातील पिण्याच्या पाण्याचे नमुन्यांची तपासणी केली, असता सदर पाणी दूषित असल्याचे आढळून आले आहे. गावातील अनेक लोक डाऊच बुद्रूक, चांदेकसारे येथून पिण्याचे पाणी आणतात. यामध्ये वेळ, इंधन व पैशाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय तर होतोच लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.

शेवटी ग्रामपंचायत प्रशासनाला जागे करण्यासाठी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. या उपोषणावर ग्रामसेवक जालिंदर पाडेकर यांनी १५ मे २०२१ पर्यंत आर. ओ. प्लांटचे नियोजन करून कार्यान्वित करण्यात येईल असे लेखी पत्र दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे. असे पवार यांनी सांगितले आहे. याप्रसंगी कुणाल जमदाडे, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब खरात, मच्छिंद्र गायकवाड, डॉ. बाबासाहेब पाटील, शेतकरी लक्ष्मण पवार उपस्थित होते.