शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांसह १५० कर्मचार्‍यांच्या बदल्या

By admin | Updated: June 5, 2014 00:06 IST

अहमदनगर : अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्यासह महसूलमधील १५० कर्मचार्‍यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

अहमदनगर : अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्यासह महसूलमधील १५० कर्मचार्‍यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. जगताप हे बीड येथील अंबेजोगाई येथे बदलून गेले. त्यांच्या जागेवर सोलापूरहून राजेंद्र भोसले बदलून येत आहेत. जगताप यांच्या बदलीचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंगळवारी (दि.३) आले होते. त्यांनी लगेच पदभारही सोडला. भोसले बुधवारी नगरला येणार होते. मात्र, ते सायंकाळपर्यंत हजर झाले नव्हते. गेली अडीच वर्षे जगताप हे नगरमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांनी या काळात जमिनीचे बाराशेवर दावे निकाली काढले. खंडकर्‍यांच्या जमीन वाटपाचे कामही त्यांनी मार्गी लावले. आम आदमी, संजय गांधी, करमणूक करातही शंभर टक्क्यांवर वसुली केली. सरकारी कार्यालयांना जमिनी देण्याबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. वनहक्काची ३ हजार ६७४ प्रकरणांची व्दितीय सुनावणी पूर्ण केली. खंडकर्‍यांचे जिल्ह्यात हरेगाव, साकरवाडी, बेलवंडी, चांगदेवनगर, टिळकनगर, लक्ष्मीनगर असे सहा मळे आहेत. यातील १२ हजार एकर जमिनीचे २ हजार शेतकर्‍यांना वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. तब्बल ६३ गावांतील हे क्षेत्र होते. ते विहित मुदतीत पूर्ण करण्याचे काम त्यांनी पूर्ण केले. एकलहरे, श्रीरामपूर, पुणतांबा येथील वाटप बाकी आहे. चांगदेवनगरमधील ९० टक्के काम झाले आहे. उर्वरित कामे नवीन अपर जिल्हाधिकार्‍यांना पूर्ण करावी लागणार आहेत. जिल्ह्यातील तब्बल १५० कारकून, अव्वल कारकून, शिपाई, मंडल अधिकारी, तलाठी यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यांनाही मंगळवारीच बदलीचे आदेश दिल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)