शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
3
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंबपरला कार धडकली, ८ जण ठार
4
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
5
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
6
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
8
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
9
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
10
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
11
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
12
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
13
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
14
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
15
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
16
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
17
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
18
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
19
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
20
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

चुंबकीय चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2019 4:34 AM

वारकऱ्यांचा लोंढा कुठून येतो नि या चैतन्याच्या नदीत सामील होतो हे गुपितच आहे.

- विजयराज बोधनकरपंढरपूरची वारी ही चैतन्याची नदी आहे. सतत तेरा-चौदा दिवस वाहत राहते. वारकऱ्यांचा लोंढा कुठून येतो नि या चैतन्याच्या नदीत सामील होतो हे गुपितच आहे. भक्ती आणि शिस्त यांचा संगम पाहायला मिळतो. ही वारी काही कालपरवाची गोष्ट नव्हे. इ.स.१२३७ च्या आसपास होयसाळ राजाच्या कारकिर्दीतल्या एका शिलालेखात विठ्ठलाचा आणि वारीचा उल्लेख आहे. पंढरी हे गावच मुळात शालीवाहन शकाच्या प्रारंभीपासून वसलेले आहे. इतका प्राचीन इतिहास या वारीला आहे. संतांच्या जन्मगावावरून अनेक पालख्या निघतात. तुकोबारायाच्या पालखीचासुद्धा इतिहास आहे. तुकारामाच्या घराण्याचे मूळ पुरुष विश्वंबरबाबा ते तुकाराम त्यांच्यापासून आठव्या पिढीचे वंशज. तेव्हापासून किंवा त्याही अगोदरपासून या वारीची परंपरा सुरू आहे. विश्वंबरबाबांनंतरही त्यांचे दोन्ही पुत्र हरी आणि मुकुंद यांनी ही वारी केली. परंतु क्षत्रिय धर्म पालनाकारणे देहू सोडून राजाश्रयाला गेलेत. पुढे राज्यावर इस्लामी आक्रमणे झालीत. त्या वेळेस ते दोघेही लढाईत मारले गेलेत. त्यातल्या मुकुंदची बायको सती गेली व हरीची बायको गर्भवती होती. तिला मुलगा झाला तो विठ्ठल. त्यानेही विठ्ठलवारी चालू ठेवली. त्याला विवाहानंतर पदाजी नावाचा मुलगा झाला, पदाजीला शंकर नावाचा मुलगा झाला. शंकराच्या पोटी बोल्होबाने जन्म घेतला आणि बोल्होबाच्या पोटी तुकारामाने जन्म घेतला. बोल्होबाने चाळीस वर्षे पंढरपूरची वारी केली. त्यानंतर तुकाराम महाराज १४00 वारकऱ्यांसमवेत वारी करू लागले. त्यांचे धाकटे बंधू कान्होबा यांनीही वारी केली. तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायणबाबा यांनी वारीची परंपरा चालूच ठेवली ती आजतागायत सुरू आहे. ज्ञानेश्वर महाराजांपासून अनेक संतांची पावले या वारीला जाऊन मिळालीत. पंढरपूरची वारी हा निर्मळाचा ध्यास आहे. ही परंपरा शुद्ध भक्तीची आनंद यात्रा आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक