शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

एकाग्रतेची गुरूकिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 1:13 AM

तुम्ही एखाद्या गोष्टीत खोलवर समरस झालात, तर लक्ष आपोआप केंद्रित होते.

- सद्गुरू जग्गी वासुदेवमी योगक्रियांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी धडपडत आहे. त्यात सुधारणा झाली आहे, परंतु सर्व शक्तिनिशी लक्ष केंद्रित करून, समाधीच्या गहन अवस्थेचा अनुभव कसा घ्यावा, याविषयी आपण मला सांगू शकाल का, असा सवाल कुणीतरी मला केला. मी म्हणालो, लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू नका. कोणत्या तरी गोष्टीत स्वत:ला गुंतवून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एखाद्या गोष्टीत खोलवर समरस झालात, तर लक्ष आपोआप केंद्रित होते. ज्या ठिकाणी मनापासून सहभाग नसतो, तिथे तुम्ही लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केलात, तर तो एक छळ होईल; एकाग्रता साधता येणार नाही. उदाहरणार्थ, बहुतांश मुलांना त्यांची पाठ्यपुस्तके म्हणजे एक प्रकारचा छळ वाटतो. त्यात लिहिलेल्या गोष्टी रंगतदार नसतात, म्हणून नाही. कित्येक विलक्षण गोष्टी एका लहानशा पाठ्यपुस्तकात लिहिलेल्या असतात, पण त्या कदाचित निरसतेने लिहिल्या गेल्या असतील. ते ज्या पद्धतीने सादर केले आहे, केवळ त्यामुळे असे घडते. जर तुम्ही मुलांना एखाद्या गोष्टीत गुंतवून ठेवलेत, तर तुम्हाला त्यांचे लक्ष केंद्रित करण्याविषयी काळजी करावी लागणार नाही. ते सदैव एकाग्र राहू शकतील. तुमच्या बाबतीतही हेच लागू पडते. एखाद्या गोष्टीत सहभागी न होता आणि गुंतवून न घेता, तुम्ही जर तुमचे मानसिक लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केलात, तर त्यामुळे केवळ तुमचा छळच होईल, स्वास्थ्य लाभणार नाही. तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष द्यायचा प्रयत्न करत आहात, तिथे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यावर तुमचे प्रेम जडायला हवे. हे मी अनेक वेळा सांगितले आहे, पण कदाचित तुमचे तिथे लक्ष नव्हते. तुम्ही केवळ एखाद्या गोष्टीच्या प्रेमात पडणे आवश्यक आहे. तुम्ही जर तुमच्या बुद्धीला चालना दिलीत, तर तुम्ही इच्छित अशा कोणत्याही गोष्टीच्या प्रेमात पडू शकता, हे तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर लक्ष केंद्रित करणे आपोआप होईल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक