मित्रांनो.... सकारात्मक विचार हे जीवन जगण्याचे सूत्र...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 06:07 PM2020-02-01T18:07:37+5:302020-02-01T18:08:18+5:30

" कोण म्हणतं जीवनात प्रत्येकवेळी काटेरी डंखच आहेत अरे डोळे उघडून बघा.. प्रत्येकाला उडण्यासाठी फुलपाखरासारखे पंख आहेत .

Friends...Positive thoughts are a way of life ... | मित्रांनो.... सकारात्मक विचार हे जीवन जगण्याचे सूत्र...

मित्रांनो.... सकारात्मक विचार हे जीवन जगण्याचे सूत्र...

googlenewsNext

मनासारखा नवरा नाही मिळाला . करायचा म्हणून संसार करते . जगण्यात काही मजाच नाही सर , खूप नैराश्य येते , रोजचीच भांडणं , हेवे - दावे - तूतू मैं - मै जीवन नकोसे वाटतंय , झोप येत नाही , जेवण जात नाही असं उदास व रडक्या आवाजात रडगाणं गाणाऱ्या महिलेला पाहून वाटलं . या स्त्रीला कसा का होईना - नवरा बरोबर तरी आहे , ज्यांच्या आयुष्यात पतीच नाही त्या बाईने काय करायचे ? त्याचवेळी एक गाणं आठवलं . " चाँद मिलता नहीं - सबको संसार मे । है दिया ही बहोत रोशनी के लिए ।  " खरोखरच मित्रांनो आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण कसा विचार करतो यावर अवलंबून आहे . मनात दररोज ( २४ तासांत ) ६० हजार विचार येतात . यातील ६० % ते ७० % विचार हे नकारात्मक असतात . दर १५ ते २० सेकंदाला नवीन विचार येतो हे चक्र अव्याहतपणे चालू असतं . ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस विश्वात जेवढे नकारात्मक तरंग आहेत त्याच्याशी आपण जोडले जाऊन . नकारात्मक विचारांची गर्दी आपल्या भोवती जमते त्यामुळे उदास वाटायला लागतं यातून त्या व्यक्तीची  नैराश्याकडे वाटचाल सुरू होते . रेडिओ किंवा वाहिन्या ज्या बॅडवर आपण लावतो तेच प्रक्षेपण लगेच चालू होते . म्हणून नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे गरजेचे असते .सकारात्मक विचार आपली शक्ती , आत्मविश्वास , मनोबल वाढवतात , नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय . यालाच तुकाराम महाराज म्हणतात . " रात्रदिनं आम्हां युदधाचा प्रसंग " ! थॉमस अल्वा एडिसनने ९९९ प्रयोग केले - हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला , थॉमसला ज्यावेळेस पाकारांनी मुलाखतीत विचारलं , - थॉमस ९९९ प्रयोग फसले याबाबत तुला काय वाटले ? थॉमस म्हणाला - ९९९ प्रयोग फसले असे म्हणू नका . ९९९ वेळा मी हे सिध्द केलं , या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही . हा माझा सकारात्मक दृष्टीकोन .  दृष्टीटेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे . जर असा विचार केला की , अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं . पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की , नैराश्य , व्याकुळता , हताशपण येतं , सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून - अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्वास वाढतो . नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो . परिणामी कमांची गती मंदावते - चुका होतात - हानी होते व यातूनच औदासिन्य येते.
माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांना नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले . आकाशवाणीवर आवाजाच्या खरखरपणामुळे नाकारल्या गेलेल्या अभिनेते अमिताभ बच्चनने त्याच आवाजाच्या जोरावर चित्रपटसृष्टीला हलवून सोडले . काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते . म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा . " कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत अरे डोळे उघडून बघा - प्रत्येकाला उडण्यासाठी - फुलपाखरासारखे पंख आहेत . "मित्रांनो सकारात्मक विचार हे जीवन जगण्याचे सूत्र आहे .

Web Title: Friends...Positive thoughts are a way of life ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.