नोबेल पुरस्काराने गौरवलेले भारतीय

By admin | Published: October 10, 2014 12:00 AM2014-10-10T00:00:00+5:302014-10-10T00:00:00+5:30

थोर मानवतावादी सेविका मदर तेरेसा यांचा १९७९ साली शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरव करण्यात आला.

डॉ. अमर्त्य सेनना १९९८ साली अर्थशास्त्रातील नोबेल देण्यात आले.

डॉ. सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना १९८३ साली भौतिकशास्त्रातील नोबेल देण्यात आले.

डॉ. हरगोविंद खुराणा यांना १९६८ साली वैद्यकशास्त्रातील नोबेल देण्यात आले.

डॉ. वेंकटरमण रामकृष्णन यांना २००९ साली रसायनशास्त्रातील नोबेल मिळाले.

सर सी. व्ही. रमण यांना १९३० साली भौतिकशास्त्रातील (रमण ईफेक्ट) नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले.

साहित्यकार रवींद्रनाथ टागोर यांना १९१३ साली साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला.

बालहक्कांसाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते कैलास सत्यर्थी यांना यावर्षी (२०१४) शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यापूर्वी नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरलेले भारतीय नागरिक..