बिहार, झारखंड, यूपीमध्ये वादळाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 07:39 AM2018-05-30T07:39:44+5:302018-05-30T07:39:44+5:30

मवारी संध्याकाळी उत्तर प्रदेश, बिहार व झारखंड या तीन राज्यांना वादळाने जोरदार तडाखा दिला. या तीन राज्यांत मिळून किमान ४0 बळी गेले.

सर्वाधिक म्हणजे १७ जणांचा मृत्यू बिहारमध्ये झाला. झारखंडमध्ये १३ आणि उत्तर प्रदेशमध्ये १0 जण मृत्युमुखी पडले आहेत

वादळामुळे विजेचे खांब व झाडे कोसळून काही जण मरण पावले, तर काही जणांचा मृत्यू विजा कोसळल्याने झाला, असे सांगण्यात आले.