शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ वनवृत्तात वन्य प्राण्यांच्या शिकारीत वाढ

By admin | Updated: October 25, 2014 22:48 IST

यवतमाळ वनवृत्ताचा कारभार सध्या पूर्णपणे ढेपाळला आहे. राखीव वनातील सागवान तस्करीने येथे कळसच गाठला आहे. त्यात आता वन्यप्राण्यांच्या शिकारीने भर घातली असल्याचे दिसून येते.

यवतमाळ : यवतमाळ वनवृत्ताचा कारभार सध्या पूर्णपणे ढेपाळला आहे. राखीव वनातील सागवान तस्करीने येथे कळसच गाठला आहे. त्यात आता वन्यप्राण्यांच्या शिकारीने भर घातली असल्याचे दिसून येते. यवतमाळ वन विभागासह संपूर्ण वन वर्तुळातच मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांच्या शिकारी होत आहे. गेल्या वर्षभऱ्यात शिकारीच्या अनेक घटना उघडकीस आल्या. त्यात बिबटाच्याच शिकारी आढळून आल्या आहे. असे असताना या शिकारींची फारशी गांभीर्याने दखल घेतली जात असल्याचे दिसून येत नाही. यवतमाळ वन विभागातील लासीना येथे एका बिबटाची शिकार झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर जोडमोहा वनपरिक्षेत्रात बिबटाच्या शिकारीच्या दोन घटना उघडकीस आल्या. या घटनेची शाही वाळते न वाळते तोच येथील धामणगाव मार्गावरील मोहा शिवारात एका बिबटाचा मृतदेह आढळून आला होता. यवतमाळ वनपरिक्षेत्रातील वाघापूर बीटमध्येही राखीव वनात एक बिबट कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर आता पुसद वनपरिक्षेत्रातील शेंबाळपिंपरी शिवारात बिबटाचा चामडे सोललेला मृतदेह आढळून आला. बिबटाचे चामडेच बेपत्ता असल्याने त्याची शिकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात घटना घडल्यानंतर शिकाऱ्यांच्या मुसक्या मात्र आवळल्या गेल्या नाही. त्यामध्ये वन विभाग सपशेल अपयशी ठरला. वन्य प्राण्यांची शिकार हा कळीचा मुद्दा झाला असताना त्यावर अंकुश निर्माण करण्यासाठी वन विभागाला अपयश आले. एवढेच नव्हेतर हिवरी वनपरिक्षेत्रातील मनपूर बीटमधील शेकडो सागवान वृक्षांची कत्तल करून लाकूडसाठा तस्करी करण्यात आला. ट्रक फसल्याने घाटंजी वनपरिक्षेत्रातील साखरा आणि हिवरी वनपरिक्षेत्रातील मनपूर बीटमधील लाकूड साठा लंपास करण्याच्या दोन गंभीर घटना टळल्या. पुसद वनपरिक्षेत्रातही या पूर्वी ट्रक फसल्यानेच शेकडो सागवान वृक्षांची कत्तल आणि तस्करी उघडकीस आली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात या घटना घडल्यानंतरही वन विभाग त्याबाबत फारसे गंभीर नाही. त्यातूनच अलिकडे जोडमोहा वन परिक्षेत्रातील मार्तंडा आणि पहूर बीटमध्ये शेकडो सागवान वृक्षांची कत्तल आणि तस्करी उघडकीस आली. एकूणच वन संरक्षणावर येथील वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यातूनच या घटना वाढल्याचे दिसून येत आहे. राखीव वनातील गस्तही कागदोपत्रीच होत असल्याचेही अनेक घटनांवरून पुढे आले आहे. त्यावर आता वरिष्ठ काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)