शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी साजे इमारतीविना

By admin | Updated: September 15, 2014 00:25 IST

स्वातंत्रपूर्ण काळापासून महसुलाचा एक महत्वाचा विभाग असलेले तलाठी साजे व मंडळ कार्यालये कार्यरत आहे़ शेती व प्लॉटचे महत्वाचे दस्तऐवज या कार्यालयात जतन करून असतात.

मारेगाव : स्वातंत्रपूर्ण काळापासून महसुलाचा एक महत्वाचा विभाग असलेले तलाठी साजे व मंडळ कार्यालये कार्यरत आहे़ शेती व प्लॉटचे महत्वाचे दस्तऐवज या कार्यालयात जतन करून असतात. मात्र तालुक्यातील बहुतांश तलाठी साजे व मंडळ कार्यालयांना स्वत:च्या मालकीची सुरक्षित वास्तूच नसल्याने महत्वाचे दस्तऐवज वाऱ्यावर आहे़ या गंभीर प्रकाराकडे शासनानेही कधी लक्ष दिले नाही़ग्रामपंचायत अस्तित्वात येण्यापूर्वीपासून देशात तलाठी साजे अस्तित्वात आहे़ तलाठी साजावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंडळ कार्यालये असतात. तालुक्यातील १०९ गावांसाठी तलाठ्यांचे ३१ साजे आहेत. या ३१ साजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुक्यात कुंभा, बोटोणी, मार्डी, मारेगाव व वनोजादेवी असे एकूण पाच मंडळ कार्यालये प्रशासनाने निर्माण केले आहे़ परंतु यातील तीन तलाठी साजे सोडून २८ साजे व पाच मंडळ कार्यालयांना अद्याप स्वत:च्या मालकीची इमारतच नाही़महसूल यंत्रणेतील तलाठी हा शेवटचा घटक आहे़ गावपातळीवर शेती संदर्भातील दप्तर सांभाळण्यासह इतरही अनेक महत्वाची कामे तलाठी साजातून होतात. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून हे पद अस्तित्वात आहे़ तरीही तलाठी साजांना अद्याप स्वत:ची हक्काची वास्तू मिळाली नाही़ इतरांना जागा उपलब्ध करून देणारे तलाठी साजेच स्वत: मात्र जागेअभावी उपेक्षित आहेत. तलाठी कार्यालये बांधावे, यासाठी कुणी आवाज उठविला, असेही आजपर्यंत कधी घडले नाही़ त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे शासनानेही कधी लक्षच दिले नाही़ या बाबीसंबंधात तहसील प्रशासनाकडून अधिक माहिती जाणून घेतली असता, अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. त्यात केवळ तालुक्यातील सगनापूर, मारेगाव, जळका या तीन गावातील साजांना स्वत:च्या मालकीच्या इमारती असल्याची माहिती मिळाली़ त्यातही जळका येथील इमारत जीर्ण झाल्याने ती नादुरूस्त आहे़ तालुक्याचे ठिकाण असलेल्या मारेगाव साजाची इमारत जुन्या काळातील चावडी आहे़ पाचपैकी एकही मंडळ कार्यालय स्वत:च्या मालकीच्या इमारतीत नाही़ नवरगाव, कोलगाव, करणवाडी, नरसाळा, कुंभा, चिंचाळा या सहा साजांनी भाड्याच्या वास्तू कार्यालयासाठी घेऊन भाडे काढल्याची नोंद आहे़ उर्वरित साजे व मंडळ कार्यालये यांचे महत्त्वाचे दस्तऐवज एक तर गावात कुणाच्या घरी ठेवलेले असते, किंवा बहूतांश महत्वाचे दस्तऐवज तलाठी व मंडळ अधिकारी घेऊन जातात, अशी माहिती नागरिकांकडून मिळाली़ शासनाचे अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज हस्तांतरित होत असताना, या गंभीर प्रकाराकडे कुणीच लक्ष देत नाही़ बऱ्याच तलाठ्यांनी आपल्या घरीच साजा कार्यालये थाटली आहे़ या दस्तऐवजाकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याने बरेचदा तलाठी फेरफार नोंद, वारस चढविणे, वारस कमी करणे, शेतीचे क्षेत्रफळ ठरविणे, गट सर्वे नंबर बनविणे आदी कामांसाठी मोठा मोबदला मागतात, अशी शेतकऱ्यांकडून नेहमी ओरड होते. जवळ-जवळ सर्व तलाठी व मंडळ अधिकारी तालुक्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याबाहेर राहतात, ही सुद्धा वस्तुस्थिती सर्वत्र दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)