शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

आयटीआयला प्रवेश मिळेल का रे भाऊ; चार हजार जागांवर विद्यार्थ्यांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 5:00 AM

दरवर्षी दहावीत कमी गुण मिळाल्यास विद्यार्थी तातडीने रोजगार मिळविण्याच्या उद्देशाने आयटीआय अभ्यासक्रमाकडे धाव घेतात. मात्र यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करून दहावीचा निकाल भरघोस लावण्यात आला. जवळपास सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बहुतांश विद्यार्थ्यांना ९० पेक्षा अधिक टक्के मिळाले. त्यामुळे आयटीआय पेक्षा आता विज्ञान किंवा वाणिज्य या शाखांमधून अकरावी करण्याकडे कल वाढला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात शंभर जागा घटल्या : दहावीच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रियेला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : दहावीनंतर व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन रोजगार उपलब्ध करून देणारा अभ्यासक्रम म्हणून आयटीआयकडे पाहिले जाते. यंदा जिल्ह्यात आयटीआयची प्रवेश प्रक्रिया दहावीचा निकाल लागण्याच्या पूर्वीच सुरू झाली आहे. मात्र अद्याप या प्रक्रियेला म्हणावी तेवढी गती आलेली नाही. जिल्ह्यात १६ शासकीय, दोन आश्रमशाळा आणि तीन खासगी अशा  २१ औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. त्यामध्ये एकूण चार हजार १०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. दहावीच्या गुणपत्रिका अद्याप न मिळाल्याने आयटीआयला अर्ज करणाऱ्यांची संख्या कमी दिसत आहे. मात्र लवकरच अर्ज वाढण्याची शक्यता आहे. 

दहावीच्या ‘भरघोस’ निकालाचा घोळ 

- दरवर्षी दहावीत कमी गुण मिळाल्यास विद्यार्थी तातडीने रोजगार मिळविण्याच्या उद्देशाने आयटीआय अभ्यासक्रमाकडे धाव घेतात. मात्र यंदा कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द करून दहावीचा निकाल भरघोस लावण्यात आला. जवळपास सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बहुतांश विद्यार्थ्यांना ९० पेक्षा अधिक टक्के मिळाले. त्यामुळे आयटीआय पेक्षा आता विज्ञान किंवा वाणिज्य या शाखांमधून अकरावी करण्याकडे कल वाढला आहे. मात्र विद्यार्थ्यांचा हा मानसिक घोळ अकरावी प्रवेशाच्या सीईटीनंतर मिटणार असून त्यानंतरच आयटीआय प्रवेशासाठी अर्ज वाढणार असल्याचे जाणकारांनी सांगितले. 

सर्वांनाच हवा ‘वायरमन’

मागील वर्षीप्रमाणे यंदाही वायरमन व इलेक्ट्रीशियन या दोन ट्रेडसाठी अर्ज येत आहे. इतर ट्रेडसाठीही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद असला तरी दोन ट्रेडवर अधिक भर आहे. राज्यात आयटीआयच्या १ लाख ३६ हजार जागांसाठी ४७ हजार ९४८ अर्ज आले. केंद्रीय पद्धतीची असल्याने जिल्ह्यातील अर्जांचा आकडा सध्या अस्पष्ट आहे. 

 

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेजEducationशिक्षण