शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
2
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
3
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
4
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
7
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
8
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
9
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
10
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
11
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
12
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
13
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
19
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
20
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
Daily Top 2Weekly Top 5

आर्णी तालुक्यात पाणी प्रश्न गंभीर

By admin | Updated: November 27, 2014 23:41 IST

तालुक्यात सुमारे १०५ गावे असून ह्या वर्षी झालेल्या झालेल्या अपुऱ्या पावसामुळे २५ ते ३० गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. शासन स्तरावर प्रशासनाकडून ह्या गंभीर

आर्णी : तालुक्यात सुमारे १०५ गावे असून ह्या वर्षी झालेल्या झालेल्या अपुऱ्या पावसामुळे २५ ते ३० गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. शासन स्तरावर प्रशासनाकडून ह्या गंभीर समस्येची अद्याप तरी दखल घेतल्याचे दिसत नाही.
पंचायत समिती व तहसील कार्यालयात दरवर्षी ह्या समस्यां संदर्भात आढावा बैठक घेतल्या जाते मात्र ही आढावा बैठक जेव्हा पाणी टंचाईचे खरे चटके सुरु होतात तेव्हा सबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी वेळेवर धडपड करतात व तात्पुरती मलमपट्टी करून पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करतात. परंतु कायमस्वरूपी तोडगा काढण्यासंदर्भात ठोस निर्णय घेतल्या जात नाही. आजही अनेक गावात योजना कागदावर असल्याने लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडावा लागतो. तरोडा, अंजनखेड, जवळा, चांदणी, उमरी(पठार), शेलू.शे., सुभाषनगर, पाळोदी, चिमटा, इचोरा, सुधाकर नगर, दातोडी, बोरगाव (पुंजी), भानसरा, सुकळी, देऊरवाडी, गवना, कुऱ्हा, यरमल हेटी, भंडारी, रानिधानोरा, पांगरी, जांब, माळेगाव आदी गावांचा पाणी टंचाईशी निकटचा सबंध आहे. काही गावांचे प्रस्ताव कागदावर तर काही कामे मंजूर होऊन ते भ्रष्टाचाराने अपूर्ण स्थितीत आहे. तरोडा येथे लाखो रुपये खर्च करण्यात आले मात्र ह्या गावात आजही पाणीसमस्या समस्या कायम आहे.
तीन महिन्याअगोदर विहिरीचे काम सुरु असताना निकृष्ट कामामुळे मजुरासह स्लॅब कोसळल्याने पाच मजूर गंभीर जखमी झाले होत. तालुक्यात ऐकून १ लाख ४० हजार लोकसंख्या असून कागदोपत्री ६९ नळयोजना ४७८ हात पंप ३४० सार्वजनिक विहिरी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी दाखविल्या आहेत. भारत निर्माण योजना व राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत सुमारे ३५ कामे प्रस्तावित असताना काही कामे भ्रष्टाचाराने तर काही कामे उदासीन धोरणामुळे लाखो रुपये खर्च करूनही अपूर्णच आहे.
पिण्याचा पाण्याचा प्रश्न याही वर्षी मार्च महिन्यापासून आर्णी तालुक्यात बिकट बनणार आहे. त्यामुळे या विभागातील केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, आमदार राजू तोडसाम व आमदार ख्वाजा बेग यांनी संबधित यंत्रणेला धारेवर धरून नागरिकांच्या या जिवनावश्यक प्रश्नाचे आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)