शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘मुद्रा’च्या कर्जवाटपावर केंद्रीय राज्यमंत्र्यांची नाराजी

By admin | Updated: May 25, 2016 00:17 IST

मुद्रा योजनेंतर्गत जिल्ह्यात ज्या प्रमाणात कर्जवाटप होणे आवश्यक होते, तसे झाले नाही.

हंसराज अहीर : खऱ्या लाभार्थ्यांना माहिती देण्यासाठी मेळावा घेणारयवतमाळ : मुद्रा योजनेंतर्गत जिल्ह्यात ज्या प्रमाणात कर्जवाटप होणे आवश्यक होते, तसे झाले नाही. केवळ व्यवसाय सुरू असणाऱ्या व्यक्तींना व्यवसाय वाढविण्यासाठी कर्ज दिले जात आहे. नवीन व्यक्तींना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देणे अपेक्षित असताना या कर्जवाटपाचे प्रमाण नगण्य आहे, अशा शब्दात केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी नाराजी व्यक्त केली. मंगळवारी येथील महसूल भवन येथे मुद्रा योजनेसह केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा अहीर यांनी घेतला. या बैठकीला आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, आमदार राजू तोडसाम, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह उपस्थित होते. कर्जवाटपाचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे मुद्रा योजनेत जिल्ह्यात कर्जवाटपाची टक्केवारी वाढविण्यासाठी लाभार्थ्यांचा मेळावा घेण्याची सूचना बैठकीत हंसराज अहीर यांनी अग्रणी बँकेला केली. या मेळाव्यात मुद्रा बँक योजनेसह केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, अटल पेंशन योजना, प्रधानमंत्री जनधन योजना या विविध योजनांचे लाभार्थी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. मेळाव्यात लाभार्थ्यांकडून अर्ज भरून घेतले जातील. विविध बँकांचे स्टॉल यावेळी लावण्यात येतील. जिल्ह्यात १० ते १५ जूनच्या दरम्यान या मेळाव्याचे आयोजन केले जाणार असल्याचे अहीर यांनी सांगितले. मेळाव्यात बँकांच्या वतीने लाभार्थ्यांना योजनांचे अर्ज दिले जातील. पात्र लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकारून ते मंजूर करण्याची कार्यवाही केली जाईल. तसेच विमा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांचा विमा उतरवून घेतला जाणार आहे. तसेच योजनांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार असल्याचे आढावा बैठकीत सांगण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)