शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींना ‘अच्छे दिन’ येणार

By admin | Updated: December 10, 2014 23:03 IST

आदिवासींना दिल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधा, पाणी, वीज, शिक्षण यामध्ये नक्कीच सुधारणा होईल. केंद्रात ‘अच्छे दिन’ येईल की नाही हे सांगता येणार नाही. मात्र राज्यात आदिवासींसाठी नक्कीच

राज्यपालांची ग्वाही : आकोली बुद्रुक येथील नागरिकांसोबत संवाद
प्रवीण पिन्नमवार - आकोली बुद्रुक (पांढरकवडा )
आदिवासींना दिल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधा, पाणी, वीज, शिक्षण यामध्ये नक्कीच सुधारणा होईल. केंद्रात ‘अच्छे दिन’ येईल की नाही हे सांगता येणार नाही. मात्र राज्यात आदिवासींसाठी नक्कीच ‘अच्छे दिन येईल’अशी ग्वाही महामहिम राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी दिली.
पांढरकवडा तालुक्यातील गोपालपूरजवळील आकोली बुद्रुक येथील संत गाडगेबाबा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत बुधवारी आयोजित ‘विद्यार्थी संवाद’ या कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव बोलत होते. यावेळी आमदार प्रा.राजू तोडसाम, राज्यपालांचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव परिमल सिंह, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, गाडगे महाराज मिशनचे चेअरमन मधुसूदन मोहिते पाटील उपस्थित होते.
आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा, कुमरन भीम, रामजी गोंड हे जल, जमीन, जंगल या आदिवासींच्या हक्कासाठी लढले. त्यांना आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले. तथापि आदिवासींना त्यांचे हक्क मिळाले नाही. त्यांना त्यापासून वंचित राहावे लागत आहे. म्हणूनच आदिवासींचे हक्क, त्यांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा, योजना कितपत देण्यात आल्या व सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी व आदिवासी बांधवांना भेटण्यासाठी आलो आहे. यापुढील काळात आदिवासींच्या हक्कासाठी मी स्वत: राज्याचा राज्यपाल या नात्याने लढणार आहे, असे राज्यपाल म्हणाले.
लाखो डॉलरची ताकद आमच्या आदिवासी बांधवांमध्ये आहे. ती आपण ओळखली पाहीजे. स्वच्छ भारताच्या कामाची सुरूवात भारतात सर्वप्रथम गाडगे महाराजांनी केली. ते काम आपण सर्वांनी यापुढे सुरू ठेवले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी सकाळी ११.५० वाजता त्यांचे गोपालपूर जवळील आकोली बुदु्रक येथील संत गाडगे महाराज आश्रमशाळेत आगमन झाले. मुलींच्या लेझीम पथकाने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास राज्यपालांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. तसेच दिवंगत राजाराम बापू घोंगटे सभागृहाचे उद्घाटन केले. यानंतर आश्रमशाळेतील प्रांगणात ‘विद्यार्थी संवाद‘ कार्यक्रम झाला.
प्रास्ताविक गाडगे महाराज आश्रमशाळेचे संचालक सचिन घोंगटे यांनी केले. तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी गीतावर आदिवासी लोकनृत्य सादर केले. नंतर राज्यपालांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांसह राकेश नेमनवार, विजय पाटील चालबर्डीकर, नरसिंगराव सातुरवार, मुन्ना बोलेनवार, दिवाकर चौधरी, आकाश कनाके, अंकित नैताम, दिनेश सुरपाम, रामकृष्ण पाटील, नारायण भानारकर, मंगेश वारेकर व आकोली, गोपालपूर व परिसरातील ग्रामस्थ, आदिवासी बांधव व महिला उपस्थित होत्या. संचालन रवींद्र बावीसकर यांनी मानले.
निवेदनासाठी नागरिकांची गर्दी
आश्रमशाळा कार्यालयात राज्यपालांना निवेदन देण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली. यावेळी नागरिकांनी अनेक निवेदन दिले. तसेच राज्यपालांना विविध विषयावर आपले म्हणणे व गाहाणे सांगितले.