शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ३२७ गावांवर भीषण पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: March 8, 2017 00:09 IST

यावर्षी जिल्ह्यातील ३२७ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

यवतमाळ : यावर्षी जिल्ह्यातील ३२७ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दोन कोटी ८८ लाख रूपयांच्या कृती आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. जिल्हा परिषदेचा पाणीटंचाई विभाग, नैसर्गिक आपत्ती विभाग, आणि भूजल सर्वेक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सादर झालेल्या अहवालास जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंंह यांनी मंजुरी दिली आहे. ३२७ गावामध्ये पाणीटंचाई भीषण होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी जिल्हा प्रशासनाला दोन कोटी ८८ लाख रूपये लागणार आहेत. यामध्ये प्रगतीपथावरील योजना पूर्ण करणे, विंधन विहिरी अधिग्रहित करणे, तात्पुरती पूरक नळ योजना पूर्ण करणे, नळ योजनांची विशेष दुरूस्ती करणे, विंधन विहिरींची विशेष दुरूस्ती करणे, खासगी विहिरी अधिग्रहित करणे, विहीर खोल करणे, गाळ काढणे, वुडक्या झिऱ्या घेणे, टँकर आणि बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे आदींचा यामध्ये समावेश आहे. जानेवारी ते मार्चअखेरपर्यंत ७० गावांमधील उपाययोजना करण्यात येणार आहे. याकरिता एक कोटी ९६ लाख रूपये लागणार आहेत. एप्रिल ते जून या कालावधीत २५७ गाव, वाड्या, वस्त्या आणि पोडावर उपाय योजना होणार आहेत. २३७ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहे. या कामाकरिता ७३ लाख ५६ हजार रूपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. २५ गाव, वाड्या, वस्त्या आणि पोडावर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्याकरिता १८ लाख ३० हजारांचा खर्च होणार आहे. (शहर वार्ताहर) २६ गावांमध्ये बैलगाडीने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या कामावर ९० हजार रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या कालावधीत १४ तात्पुरत्या पूरक नळयोजना दुरूस्त करण्यात येणार आहे. या कामावर ४६ लाख ५० हजार रूपयांचा खर्च होणार आहे. ५२ गावामधील ५२ विशेष नळ योजनेच्या दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामावर सर्वाधिक एक कोटी ४७ लाख ८० हजारांचा खर्च करण्यात येणार आहे.