शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
2
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
3
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
4
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
7
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
8
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
9
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
10
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
11
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
12
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
13
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
19
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
20
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या शर्यतीत तिसऱ्याची ‘एन्ट्री’

By admin | Updated: December 28, 2016 00:13 IST

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी यवतमाळातून दोन नावांची शिफारस केली गेली असताना मंगळवारी मुंबईतील बैठकीदरम्यान अचानक तिसऱ्या नावाची

मुंबईतील बैठक गाजली : वाद दिल्लीत जाण्याची चिन्हे
यवतमाळ : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी यवतमाळातून दोन नावांची शिफारस केली गेली असताना मंगळवारी मुंबईतील बैठकीदरम्यान अचानक तिसऱ्या नावाची एन्ट्री झाल्याने जिल्हाध्यक्ष निवडीचा गुंता आणखी वाढला आहे.
मंगळवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश यांच्या उपस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. जिल्हा काँग्रेस कमिटीने अध्यक्षपदासाठी माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके आणि माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या नावाची शिफारस केली आहे. या दोघांमधूनच कॉँग्रेसचा नवा जिल्हाध्यक्ष निवडला जाईल, असा अंदाज असताना मुंबईतील बैठकीत अचानक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष उत्तमराव पाटील यांच्या नावाची एन्ट्री झाली. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी या नावाला ऐनवेळी पसंती दर्शविल्याचे सांगितले जाते. दोन नावे असतानाच जिल्हाध्यक्ष पदाचा दोन महिन्यांपासून निर्णय झाला नाही. आता त्यात तिसऱ्या नावाची एन्ट्री झाल्याने हा वाद आणखी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मंगळवारी जिल्हाध्यक्ष पदाचा सोक्षमोक्ष लावायचाच अशा इराद्याने जिल्ह्यातील काँग्रेसची तमाम प्रमुख नेते मंडळी प्रदेशाध्यक्षांच्या दरबारात पोहोचली होती. मात्र तेथे तिसऱ्याच्या एन्ट्रीमुळे पेच निर्माण झाला. जिल्हाध्यक्षपदाचा तोडगा मुंबईत निघण्याची शक्यता कमीच आहे. हा वाद आता थेट दिल्लीपर्यंत जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यापूर्वीसुद्धा काँग्रेस जिल्हाध्यक्षाचा वाद दिल्लीपर्यंत गेला होता, हे विशेष.
सेनापतीविना निवडणुकीची चिन्हे
जानेवारीच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आचारसंहितेपूर्वी काँग्रेसला जिल्हाध्यक्ष मिळावा म्हणून नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तिसऱ्या नावामुळे वाढलेला गुंता लक्षात घेता जिल्ह्यात काँग्रेसला अध्यक्षाशिवाय जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुका लढाव्या लागतात की काय, अशी शंका कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. वृत्तलिहीस्तोवर मुंबईतील काँग्रेसची बैठक सुरूच होती. (जिल्हा प्रतिनिधी)

जनआक्रोश यात्रा रद्द केल्याने नेत्यांची झाडाझडती
सूत्रानुसार, मुंबईतील बैठकीत प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची झाडाझडती घेतल्याचे सांगितले जाते. काँग्रेसने २९ डिसेंबरपासून भाजपा सरकारच्याविरोधात जनआक्रोश यात्रेची घोषणा केली होती. मात्र पक्षाला जिल्हाध्यक्ष नसल्याचे कारण सांगून ही यात्रा परस्परच रद्द करण्यात आली. याच मुद्यावरून प्रदेशाध्यक्षांनी आपली नाराजी प्रकट केल्याचे सांगितले जाते. शिवाय यात्रा रद्दबाबत पक्षश्रेष्ठींना न कळविता जिल्ह्यातील नेते थेट प्रसार माध्यमांना ‘अ‍ॅप्रोच’ झाल्याने प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची नाराजी आणखी वाढल्याचे समजते.