शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
4
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
5
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
6
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
7
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
10
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
11
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
12
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
13
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
14
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
15
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
16
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
17
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
18
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
19
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
20
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
Daily Top 2Weekly Top 5

फवारणी उलटली जीवावर

By admin | Updated: August 21, 2015 02:46 IST

कधी नव्हे ती जिल्ह्यातील पीक परिस्थिती यंदा उत्तम आहे, अशा स्थितीत अधिक उत्पादनासाठी शेतकरी कीड नियंत्रणासाठी फवारणी करीत आहे.

एकाचा मृत्यू : सात जणांना विषबाधा, एकाच कंपनीच्या औषधाची रिअ‍ॅक्शनसुरेंद्र राऊत  यवतमाळ कधी नव्हे ती जिल्ह्यातील पीक परिस्थिती यंदा उत्तम आहे, अशा स्थितीत अधिक उत्पादनासाठी शेतकरी कीड नियंत्रणासाठी फवारणी करीत आहे. मात्र फवारणी करताना जिल्ह्यात विविध ठिकाणी सात जणांना विषबाधा झाली. तर एका शेतमजुराचा मृत्यू झाला. विषबाधा झालेल्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. एकाच कंपनीच्या विशिष्ट औषधाने रिअ‍ॅक्शन आल्याने सांगण्यात येत आहे. जिल्ह्यातील पीक स्थिती उत्तम आहे. त्यामुळेच शेतकरी वर्गही पिकाच्या संगोपनात गुंतला आहे. कपाशीवर मावा, तुडतुडे, पांढरी माशी यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्याचे नियंत्रण करण्यासाठी किटकनाशकांची फवारणी केली जात आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणात गॅस पॉयझन असलेल्या किटकनाशकांचा वापर करत आहे. फवारणीची चुकीची वेळ आणि वाऱ्याची दिशा न लक्षात घेता फवारणी केल्यामुळे किटकनाशक फवारणी करणाऱ्याच्या अंगावर उडते. यातूनच विषबाधा होण्याचे प्रमाण वाढले आहे. एकाचवेळी जिल्ह्यातील सहा जणांना विषबाधा झाल्याने खळबळ निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे सर्वांनाच एकाच कंपनीच्या किटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा झाली आहे. राळेगाव तालुक्यातील बोरी ईजोड येथील अमर प्रकाश आत्राम (२१) हा कपाशीवर फवारणीसाठी गेला होता. त्याला घरी आल्यानंतर उलट्या सुरू झाल्या. त्यामुळे शासकीय रुग्णालयात दाखल केल. यवतमाळ तालुक्यातील कारेगाव यावली येथील बंडू उत्तम राठोड (२१) यालाही फवारणी करून आल्यानंतर विषबाधा झाली आहे. सुनील तुळशीराम राठोड (२३) रा. किन्ही (तिवसाळा) ता. घाटंजी याने स्वत:च्या शेतातच दिवसभर कपाशीवर फवारणीचे काम केले. रात्री त्याची प्रकृती गंभीर झाल्याने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नेर तालुक्यातील मालखेड बु. येथील अब्दुल खलीद अब्दुल करीम (४५), नांदगाव तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील नसीब खाँ पठाण (३५), गजानन वाघाडे (२७) यांनाही शेतात फवारणी करताना विषबाधा झाली. सर्व जणांनी एकाच कंपनीचे औषध फवारताना विषबाधा झाली आहे. यापूर्वीही फवारणीचे काम केले, मात्र असा त्रास जाणवला नसल्याचे त्यांनी सांगितले. गॅस पॉयझन असल्याने त्याचा थेट मेंदूवर आघात होत असल्याचे सांगण्यात आले. श्वसनाच्या माध्यमातून हवेतील विषाचे तुषार शरीरात जातात. यातूनही विषबाधा होण्याची शक्यता असते. सध्या कोरडे वातावरण असून, दिवसा उनं तापत आहे. सोबतच किटकनाशकांतून निघणारी वाफ याचा परिणाम होतो. शरीराला घाम येतो. या घामाच्या माध्यमातूनच अंगावर पडलेले किटकनाशक शरीरात जाते. त्यामुळेही विषबाधा होऊ शकते असे डॉक्टरांनी सांगितले. आतापर्यंत पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना चिंता लागली होती. आता पाऊस आल्याने पीक स्थिती उत्तम आहे. मात्र फवारणीतून होणारे विषबाधेचे नवीन संकट निर्माण झाले आहे. यातून वाचण्यासाठी योग्य दक्षता हाच उपाय ठरु शकतो. ज्या वेळेस हवा वाहात नाही अशा काळात फवारणी करावी अशीही सूचना कृषी तज्ज्ञांकडून केली जात आहे. विषबाधेने मृत्यूडोंगरखर्डा : कळंब तालुक्यातील पिंपळशेंडा येथील शेतकरी रामा मारूती मेश्राम (५०) याचा फवारणी करताना झालेल्या विषबाधेने मृत्यू झाला. दोन दिवसापूर्वी फवारणी करण्यात आली. घरी आल्यावर त्याला चक्कर येऊ लागली. तसेच पोटातही दुखत होते. त्यामुळे त्याला राळेगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याला विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्याकडे पाच एकर शेती असून मुलगा आणि मुलगी आहे.‘मेडिकल’चे व्हेन्टीलेटर बिघडल्याने रुग्ण रेफरयेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण सहा व्हेन्टीलेटर आहेत. मात्र यातील दोन व्हेन्टीलेटर मागील चार महिन्यांपासून बंद आहे. वरिष्ठांकडे पाठपुरावा करूनही याची दखल घेण्यात येत नाही. केवळ चार व्हेन्टीलेटरच्या भरवशावर उपचार सुरू आहे. विष प्राशनाचे सर्वाधिक रुग्ण येत असल्याने उपचार करताना अडचण निर्माण होते. रानडुकराच्या हल्ल्यात चार महिला गंभीर शिरसगाव पांढरी : रानडुकराने हल्ला केल्याने चार महिला मजूर जखमी झाल्याची घटना नेर तालुक्यातील शिरसगाव येथे गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. शिरसगाव येथील शेतकरी विठ्ठलराव ढबाले यांच्या शेतात सकाळी ८ वाजता महिला निंदण करण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका झाडाखाली महिला भोजनासाठी बसल्या. त्यावेळी अचानक एक रानडुकर तेथे आले. आणि त्याने महिलांवर हल्ला केला. यात बेला अर्जून तायडे (४०), तारा रमेश पवार (३७), निर्मला अण्णा घोडे (४०), अन्नपूर्णा हरिदास वयले (५५) असे जखमी महिलांचे नाव आहे. त्यांना नेरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या हल्ल्याने मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (वार्ताहर)