शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचा दगा, दिवाळी अंधारात

By admin | Updated: October 16, 2014 23:31 IST

सोयाबीनने दगा दिल्याने शेतकऱ्यांच्या दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर काढणीच्या खर्चा एवढेही उत्पन्न होणार नसल्याने शेतातील पिकांत जनावरे

पुसद : सोयाबीनने दगा दिल्याने शेतकऱ्यांच्या दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर काढणीच्या खर्चा एवढेही उत्पन्न होणार नसल्याने शेतातील पिकांत जनावरे सोडण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. कपाशी हे तोट्याचे पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची कास धरली. मात्र यंदा सुरूवातीला पावसाने दडी मारली. त्यानंतर पावसाने हजेरी लावताच शेतकऱ्यांनी दुबार-तिबार पेरणी केली. सोयाबीन पीक ऐन भरात आले असतानाच पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाही. अनेक शेतात तर शेगांमध्ये दाणेच तयार झाले नसल्याचे दिसून आले. सोंगणी आणि काढणीचा खर्च मोठा आहे. सोंगणी आणि काढणीचा खर्चही होणाऱ्या उत्पन्नातून निघणे कठीण आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्या ऐवजी त्यात जनावरे सोडण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी शेतकऱ्यांची दिवाळी सोयाबीन पिकाच्या भरवशावर साजरी होत असते. मात्र सोयाबीन पीकच हातून गेल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गाची दिवाळी अंधारात जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन नुकसानीची पाहणी करावी तसेच सर्वे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी बांधवांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)