शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगा अभयारण्यातील ४० गावांचा सरकारशी असहकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 21:18 IST

पैनगंगा अभयारण्याच्या घनदाट जंगलात राहणारे नागरिक प्रजासत्ताकाच्या ६८ वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अर्ज, विनंत्या आणि आंदोलने करूनही सरकारने दखल घेतली नाही. परिणामी या भागातील ४० गावांनी आता सरकारशी असहकार पुकारण्याचा निर्धार केला आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या विशेष ग्रामसभेत गावकऱ्यांनी तसा ठराव करून आंदोलनाची शपथ घेतली.

ठळक मुद्देग्रामसभेत ठराव : स्वातंत्र्यपूर्व काळापासून जगताहेत उपेक्षेचे जीणे

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पैनगंगा अभयारण्याच्या घनदाट जंगलात राहणारे नागरिक प्रजासत्ताकाच्या ६८ वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अर्ज, विनंत्या आणि आंदोलने करूनही सरकारने दखल घेतली नाही. परिणामी या भागातील ४० गावांनी आता सरकारशी असहकार पुकारण्याचा निर्धार केला आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या विशेष ग्रामसभेत गावकऱ्यांनी तसा ठराव करून आंदोलनाची शपथ घेतली.विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा अभयारण्यात यवतमाळ जिल्ह्यातील ४० गावे येतात. बंदी भाग म्हणून ब्रिटिशांच्या काळापासून या गावांची ओळख आहे. घनदाट जंगल आणि वन्य श्वापदांच्या सहवासात राहणाºया या गावांत कोणत्याही मूलभूत सुविधा नाही. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य आदींची वानवा आहे. संपूर्ण अर्थव्यवस्था जंगलावर असताना आता वन विभागाच्या जाचक अटींनी ही अर्थव्यवस्थाही मोडकळीस आली आहे. गोपालन हे नागरिकांचे मुख्य उपजीविकेचे साधन. परंतु चराईबंदीमुळे जनावरे विकण्याची वेळ आली आहे. अभयारण्याच्या कायद्यामुळे रस्त्यांची डागडुजी केली जात नाही. पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटतो. अशा एक ना अनेक समस्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाचवीला पुजलेल्या आहेत.मूलभूत सुविधा मिळाव्या म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून नागरिक आंदोलने करीत आहेत. शासन दरबारी आपल्या मागण्या मांडीत आहेत. परंतु आश्वासनापलिकडे काहीही मिळाले नाही. परिणामी ४० गावातील नागरिक एकत्र आले. बंदी भागाचे वास्तव शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी असहकार आंदोलनाचे हत्त्यार उपसले. २६ जानेवारी रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत या ४० गावातील नागरिकांनी आंदोलनाचा ठराव केला. पंचायत समितीपासून पंतप्रधान कार्यालयापर्यंत ठराव आणि निवेदने पाठविण्यात येणार आहे. याउपरही दखल घेतली नाही तर सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याची शपथ याच ग्रामसभेत गावकºयांनी घेतली आहे. विशेष म्हणजे, आंदोलनात महिलांचा पुढाकार राहणार आहे. प्रत्येक गावचे सरपंच, पोलीस पाटील आणि सुजाण नागरिक या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे उमरखेड तालुक्यातील बिटरगावचे सरपंच प्रकाश पेंधे यांनी सांगितले.अशा आहेत मागण्याबंदी भागातील नागरिकांना तेंदूपत्ता, मोहफूल, डिंक, चारोळी, मध संकलनासाठी स्वामित्व मिळावे, गुरे चारण्यासाठी राखीव गायरान द्यावे, शेतजमिनीचे भोगवटादार क्र.१ असे प्रमाणपत्र द्यावे यासोबतच विविध मूलभूत सुविधा देण्याची मागणी आहे.

टॅग्स :forestजंगलYavatmalयवतमाळ