शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

पैनगंगा अभयारण्यातील ४० गावांचा सरकारशी असहकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 21:18 IST

पैनगंगा अभयारण्याच्या घनदाट जंगलात राहणारे नागरिक प्रजासत्ताकाच्या ६८ वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अर्ज, विनंत्या आणि आंदोलने करूनही सरकारने दखल घेतली नाही. परिणामी या भागातील ४० गावांनी आता सरकारशी असहकार पुकारण्याचा निर्धार केला आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या विशेष ग्रामसभेत गावकऱ्यांनी तसा ठराव करून आंदोलनाची शपथ घेतली.

ठळक मुद्देग्रामसभेत ठराव : स्वातंत्र्यपूर्व काळापासून जगताहेत उपेक्षेचे जीणे

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पैनगंगा अभयारण्याच्या घनदाट जंगलात राहणारे नागरिक प्रजासत्ताकाच्या ६८ वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अर्ज, विनंत्या आणि आंदोलने करूनही सरकारने दखल घेतली नाही. परिणामी या भागातील ४० गावांनी आता सरकारशी असहकार पुकारण्याचा निर्धार केला आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या विशेष ग्रामसभेत गावकऱ्यांनी तसा ठराव करून आंदोलनाची शपथ घेतली.विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा अभयारण्यात यवतमाळ जिल्ह्यातील ४० गावे येतात. बंदी भाग म्हणून ब्रिटिशांच्या काळापासून या गावांची ओळख आहे. घनदाट जंगल आणि वन्य श्वापदांच्या सहवासात राहणाºया या गावांत कोणत्याही मूलभूत सुविधा नाही. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य आदींची वानवा आहे. संपूर्ण अर्थव्यवस्था जंगलावर असताना आता वन विभागाच्या जाचक अटींनी ही अर्थव्यवस्थाही मोडकळीस आली आहे. गोपालन हे नागरिकांचे मुख्य उपजीविकेचे साधन. परंतु चराईबंदीमुळे जनावरे विकण्याची वेळ आली आहे. अभयारण्याच्या कायद्यामुळे रस्त्यांची डागडुजी केली जात नाही. पावसाळ्यात या गावांचा संपर्क तुटतो. अशा एक ना अनेक समस्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाचवीला पुजलेल्या आहेत.मूलभूत सुविधा मिळाव्या म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून नागरिक आंदोलने करीत आहेत. शासन दरबारी आपल्या मागण्या मांडीत आहेत. परंतु आश्वासनापलिकडे काहीही मिळाले नाही. परिणामी ४० गावातील नागरिक एकत्र आले. बंदी भागाचे वास्तव शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी असहकार आंदोलनाचे हत्त्यार उपसले. २६ जानेवारी रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत या ४० गावातील नागरिकांनी आंदोलनाचा ठराव केला. पंचायत समितीपासून पंतप्रधान कार्यालयापर्यंत ठराव आणि निवेदने पाठविण्यात येणार आहे. याउपरही दखल घेतली नाही तर सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याची शपथ याच ग्रामसभेत गावकºयांनी घेतली आहे. विशेष म्हणजे, आंदोलनात महिलांचा पुढाकार राहणार आहे. प्रत्येक गावचे सरपंच, पोलीस पाटील आणि सुजाण नागरिक या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे उमरखेड तालुक्यातील बिटरगावचे सरपंच प्रकाश पेंधे यांनी सांगितले.अशा आहेत मागण्याबंदी भागातील नागरिकांना तेंदूपत्ता, मोहफूल, डिंक, चारोळी, मध संकलनासाठी स्वामित्व मिळावे, गुरे चारण्यासाठी राखीव गायरान द्यावे, शेतजमिनीचे भोगवटादार क्र.१ असे प्रमाणपत्र द्यावे यासोबतच विविध मूलभूत सुविधा देण्याची मागणी आहे.

टॅग्स :forestजंगलYavatmalयवतमाळ