शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

एकाच मांडवात सुरू होते दोन बालविवाह, मंगलाष्टकांआधी पोलीस पोहोचले; अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 7:01 PM

प्रशासनाला एका बालविवाहाची अज्ञाताने टीप दिली. यंत्रणा थेट मांडवात धडकली अन् चक्क दोन कोवळ्या कळ्यांचे लग्न लावून दिले जात असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला.

ठळक मुद्देऐनवेळी धडकली यंत्रणा वऱ्हाड्यांची उडाली धांदल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना काळात यंत्रणा व्यस्त असल्याचा फायदा घेऊन जिल्ह्यात बालविवाहाचे प्रकार वाढत आहेत. अशातच प्रशासनाला एका बालविवाहाची अज्ञाताने टीप दिली. यंत्रणा थेट मांडवात धडकली अन् चक्क दोन कोवळ्या कळ्यांचे लग्न लावून दिले जात असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला. मंगलाष्टकांपूर्वीच पोलीस धडकल्याने वऱ्हाड्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली.

नाणंद या छोट्याशा गावात बुधवारी या दोन बालविवाहांची पूर्ण तयारी झाली होती. लग्न मंडप सजलेला होता, दोन्ही लग्नाचे वºहाडी हजर होते, स्वयंपाकाची तयारी जोरात सुरू होती. लग्नाची लगबग सुरु होती. अशातच एका सुज्ञ नागरिकाने चाईल्ड हेल्पलाईनवर माहिती दिली. लगेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष, खंडाळा पोलीस व चाईल्ड लाईन टिम गावात दाखल झाली. एक बालविवाह थांबविण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना चक्क दोन बालविवाह होत असल्याचे निदर्शनास आले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोन्ही अल्पवयीन मुलींना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले व वयाची शहानिशा करण्यात आली. यातील एक १४ वर्षीय बालिका व दुसरी १५ वर्षाच्या उंबरठ्यावर आहे. मात्र दोन्ही बालविवाहांचा डाव प्रशासनाने उधळला. दोघींच्याही पालकांना मुलीचे लग्न सज्ञान झाल्यानंतर करण्याबाबत समजावून सांगितले. बालविवाहाचे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ पेक्षा कमी असेल तर असा विवाह करणे हा बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अन्वये दखलपात्र गुन्हा आहे, याबाबत माहिती देण्यात आली. शेवटी अल्पवयीन बालिकांना ताब्यात घेवून त्यांना बाल कल्याण समितीकडे सादर करण्यात आले. तसेच दोन्ही नवरदेव व मध्यस्थी नातेवाईकांना तंबी देण्यात आली.

ही कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर, सामाजिक कार्यकर्ता आकाश बुरेर्वार, श्याम राठोड, बाळू आडे, प्रभारी ठाणेदार रवींद्र मस्कर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन गोमाजी राठोड, पोलीस नाईक सचिन दतात्रय राऊत, होमगार्ड सुभाष धोमनार, चाईल्ड लाईन प्रतिनिधी योगेश मेश्राम, शितल काटपेल्लीवर, पोलीस पाटील सिंधू खुडे, आशासेविका कौशल्या मार्कड, अंगणवाडीसेविका वनमाला खडसे, गावातील प्रतिष्ठित नागरिक शेषराव डाखोरे, रमेश राठोड यांच्या उपस्थित पार पडली.यवतमाळातील २० वा विवाहलॉकडाऊन आणि कोरोनाच्या परिस्थितीचा फायदा बालविवाहांसाठी घेतला जात आहे. तसेच सध्या कमीत कमी खर्चात विवाह होतो म्हणून ग्रामीण भागात लगीनघाई दिसत आहे. मार्च ते सप्टेंबरपर्यंत यवतमाळ जिल्ह्यात १८ बालविवाह माहिती मिळाल्याने रोखण्यात आले. बुधवारी त्यान दोन विवाहांची भर पडली. मात्र माहिती न मिळालेल्या विवाहांची संख्या यापेक्षा अधिक असू शकते.बालविवाहाबाबत नागरिकांनी दक्ष राहावे. बालविवाहबाबत माहिती असल्यास जिल्हा बाल संरक्षण कक्ष अथवा चाईल्ड लाइनच्या १०९८ क्रमांकावर माहिती द्यावी.- ज्योती कडू, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, यवतमाळ

टॅग्स :marriageलग्नPoliceपोलिस