शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"मातोश्रीची दारं उघडल्यास परत जाऊ", शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांचं मोठं विधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2022 15:52 IST

गावागावात जाऊन शिवसैनिकांना भूमिका समजावून सांगू व पुढे खांद्याला खांदा लाऊन काम करू, असे संजय राठोड म्हणाले.

यवतमाळ :  आम्ही आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेच शिवसैनिक आहोत. उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहेत. त्यांच्याबाबत नेहमीच आदर राहील, आणि मातोश्रीचे दार उघडल्यास परत जाऊ, असे विधान बंडखोर आमदार संजय राठोड यांनी केले. यासह, संजय राऊत यांच्यामुळे हे प्रकरण चिघळले. त्यांनी अत्यंत वाईट भाषेचा वापर केला. यामुळे आमदारांच्या मनात अधिक राग निर्माण झाला व त्यामुळेच उठाव केला असल्याचेही संजय राठोड म्हणाले.

संजय राठोड हे राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर बुधवारी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोहोचले यावेळी त्यांचे स्वागतासाठी समर्थकांनी गर्दी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना राठोड यांनी शिवसैनिकांशी भांडण नसल्याचे सांगितले. आम्ही अचानक उठाव केल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आपल्या  विरोधात भूमिका घेतली. मात्र आता गावागावात जाऊन शिवसैनिकांना भूमिका समजावून सांगू व पुढे खांद्याला खांदा लाऊन काम करू, असे ते म्हणाले. तसेच, माझ्या कार्यालयात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे असलेले फोटो कधीही काढणार नसल्याचे देखील संजय राठोड यांनी स्पष्ट केले. या कालावधीत ज्यांनी आपल्यावर गंभीर आरोप केले त्यांना देखील योग्य वेळी उत्तर देऊ असे राठोड यांनी सांगितले.

संजय राऊत यांच्यामुळे झाला उठाव

महाविकास आघाडीतून एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार बाहेर पडण्यामागे संजय राऊत हेच जबाबदार आहेत.  उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांचेशी चर्चेकरिता तयार झाले होते, आदित्य ठाकरे हे सुरत येथे जाणार होते, मात्र राऊत यांनी होणारी मध्यस्ती बिघडविली, असा गौप्यस्फोट संजय राठोड यांनी केला. यवतमाळ मध्ये बोलताना त्यांनी सत्तांतरणापूर्वीचा घटनाक्रम सांगितला. एकनाथ शिंदे सुरतला गेल्यानंतर गुलाबराव पाटील, दादा भुसे व आपण स्वतः उद्धव ठाकरेंना भेटून शिंदे यांना परत बोलविण्याबाबत नियोजन करीत होतो. त्याला उद्धव ठाकरे तयार झाले मात्र संजय राऊतांनी सर्व बिघडविले असेही राठोड यांनी सांगितलं.

टॅग्स :PoliticsराजकारणSanjay Rathodसंजय राठोडMLAआमदारSanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे