शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेची आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 5:00 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे डोळस व दूरदृष्टीचे संत होते. त्यांचे विचार सदासर्वकाळ समाजाला उपयोगी पडणारे आहेत. राष्ट्रसंतांनी १९५५ मध्ये लिहिलेला ‘ग्रामगीता’ ग्रंथ दिशादर्शक असून शासनकर्त्यांनी वाचन केल्यास त्यांनाही मार्गदर्शक ठरू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रामगीतेची हिंदी प्रत पाठविण्यात आल्याचे येथील गुरुदेव सेवा मंडळाचे उपाध्यक्ष तथा गुरुदेव भूषण पुरस्कार प्राप्त नंदकुमार पंडित यांनी सांगितले.

ठळक मुद्दे६५ वर्षांपूर्वीच दिला होता इशारा : ‘त्याने रोग प्रसार झाला, लागट रोग वाढतची गेला’, सद्यस्थितीत ग्रामगीतेच्या विचारांची नितांत गरज

प्रकाश लामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून तब्बल ६५ वर्षांपूर्वी आत्ताच्या परिस्थितीचे वर्णन केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता सर्वांनाच ग्रामगीतेची आठवण होऊ लागली आहे.कोरोना विषाणूने जगभर थैमान घातल्यानंतर शासन व प्रशासन प्रतिबंधात्मक उपायोजनांची अंमलबजावणी करीत आहे. वंदनीय राष्टसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता ग्रंथातील ‘ग्राम आरोग्य’ या १४ व्या अध्यायात स्वच्छतेचे महत्व ६५ वर्षांपूर्वीच पटवून दिले.‘चहू बाजूंनी केली घाण,त्यात जंतू झाले निर्माण।त्यातूनी रोगाच्या साथी भिन्न भिन्न,वाढ घेती’.कोरोनाने जगात धुमाकूळ घातला. प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवीत आहे. स्वच्छतेवर भर दिला जात आहे. ‘ग्रामगीता’ ग्रंथातून १९५५ मध्येच राष्ट्रसंतांनी समाजाला जागृत केले होते. राष्ट्रसंत म्हणतात,‘गाव असो अथवा शहर,तेथील बिघडले आचार-विचार।म्हणोनीच रोगराईने बेजार,जाहले सारे जनलोक’.कोरोना पार्श्वभूमीवर जनतेला ‘घरातच राहा, सुरक्षित राहा’चा सल्ला दिला. राष्ट्रसंतांनी ‘ग्रामआरोग्य’ या अध्यायात‘गाव व्हावया निरोगी सुंदर,सुधारावे लागेल एकेक घर।आणि त्याहूनि घरात राहणार,करावा लागेल आदर्श’.असे आधीच स्पष्ट केले होते.कोरोना हळूहळू तिसऱ्या टप्प्यात सरकत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नजर ठेवून आहेत. विविध उपाययोजना केल्या जात आहे. आरोग्य विभाग व प्रशासकीय यंत्रणा २४ तास परिश्रम घेत आहे. याची प्रचिती राष्ट्रसंतांनी ६५ वर्षांपूर्वीच आपल्या ‘ग्रामगीता’ ग्रंथाच्या माध्यमातून भारतीय समाजाला दिली आहे.तुकडोजी महाराज म्हणतात,‘कशास काही नियम न उरला,कोण रोगी कोठे थुंकला।कोठे जेवला, संसर्गी आला,गोंधळ झाला सर्वत्र।’.त्याचप्रमाणे...‘त्याने रोगप्रसार झाला,लागट रोग वाढतचि गेला।बळी घेतले हजारो लोकांला,वाढोनि साथ।’.यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार चिरंतन असून सर्वकाळी भारतीय समाजाला दिशादर्शक ठरणारे आहेत, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरु नये.पंतप्रधानांना पाठविली ग्रामगीतेची हिंदी प्रतराष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे डोळस व दूरदृष्टीचे संत होते. त्यांचे विचार सदासर्वकाळ समाजाला उपयोगी पडणारे आहेत. राष्ट्रसंतांनी १९५५ मध्ये लिहिलेला ‘ग्रामगीता’ ग्रंथ दिशादर्शक असून शासनकर्त्यांनी वाचन केल्यास त्यांनाही मार्गदर्शक ठरू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रामगीतेची हिंदी प्रत पाठविण्यात आल्याचे येथील गुरुदेव सेवा मंडळाचे उपाध्यक्ष तथा गुरुदेव भूषण पुरस्कार प्राप्त नंदकुमार पंडित यांनी सांगितले.