शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

पूसदमधील बाजारपेठ फुलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:29 IST

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी धोका अजून टळलेला नाही. नागरिकांसह व्यापाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. मार्चपासून ...

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी धोका अजून टळलेला नाही. नागरिकांसह व्यापाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने निर्बंध कठोर करण्यात आले. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता उर्वरित दुकाने बंद झाली. बाजारपेठ ओस पडली. टप्प्याटप्प्याने सकाळी ७ ते ११ या वेळेत अत्यावश्यक सेवेतील काही दुकानांना मुभा मिळाली. मात्र, अन्य दुकाने बंद होती. आता कोरोनाचा आलेख खाली आला. यामुळे २ जूनपासून सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा मिळाली.

दीड महिन्यापासून ओस पडलेली बाजारपेठ बुधवारी पहिल्याच दिवशी गर्दीने फुलून गेली. कापड लाइन, आजाद चौक, गांधी चौक, डॉ. आंबेडकर चौक, सुभाष चौक, शिवाजी चौक स्थित बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची एकच गर्दी झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन झाले नाही. नागरिकांनी यापुढेही कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आत्तापर्यंत निर्बंध लागू असल्याने कारवाईच्या भीतीपोटी ग्रामीण भागातील नागरिक बाजारपेठेत येणे टाळत होते. निर्बंध शिथिल झाल्याने पहिल्याच दिवशी ग्रामीण भागातील नागरिकांनी प्लॅस्टिक कापड, ताडपत्री यांसह शेतीविषयक वस्तू, साहित्य खरेदीसाठी शहरातील बाजारपेठ गाठली.

बॉक्स

भाजीपाला खरेदीसाठीही गांधी चौक, डॉ. आंबेडकर चौक, सुभाष चौक, तीन पुतळ्याजवळ, बस स्टँड परिसर, पालिकेसमोर गर्दी झाली. या गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव तर वाढणार नाही ना, याची दक्षता कुणाकडूनच घेतली गेली नाही. व्यापारी व कर्मचाऱ्यांनी रॅपिड टेस्ट करून घ्याव्यात. दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत रॅपिड टेस्ट करण्यात येत आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले.