शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

मारेगाव नगरपंचायत निवडणुकीत स्पष्ट बहुमतासाठी लागणार कस, गटबंधन महत्त्वाचे : राजकीय हालचालींना आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:48 IST

मारेगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने तांत्रिक, प्रशासकीय, राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या निवडणुकांवर कोरोना, ओबीसी ...

मारेगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दृष्टीने तांत्रिक, प्रशासकीय, राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या निवडणुकांवर कोरोना, ओबीसी आरक्षणाची टांगती तलवार आहे. यामुळे निवडणुका अपेक्षित वेळेत होणार की पुढे ढकलल्या जाणार? ही भीती सर्वांनाच सतावत आहे. २०१५ मध्ये शहरातील ग्रामपंचायत जाऊन नगरपंचायत स्थापन करण्यात आली. शहराचे १७ वाॅर्डांत विभाजन करण्यात आले. तेवढीच नगरसेवक संख्याही होती. आता यात काही बदल होईल अशी शक्यता नाही. राज्यातील नगरपंचायत निवडणुकीच्या वाॅर्ड रचनेच्या दृष्टीने मंत्रिमंडळ बैठक होत आहे. नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. शिवसेना-भाजपने अपक्ष उमेदवारांच्या मदतीने पाच वर्षे सत्ता मिळवली होती. आताही आगामी नगरपंचायत निवडणुकीत सर्वच पक्षांना बहुमताची संधी आहे. फक्त राजकीय पक्षांनी सक्षम नेतृत्व देण्याची गरज आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा चेहरा जो पक्ष या निवडणुकीत देऊ शकेल, त्या पक्षाला विजयाची संधी आहे. आज शहरात अनेक समस्या प्रलंबित आहे. नगरपंचायत प्रशासनावर पकड निर्माण करेल, अशा व्यक्तीची मतदारांना गरज आहे. जो पक्ष मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल असा उमेदवार देईल, त्यांचा विजय पक्का मानला जात आहे. तालुक्यातील काही महत्त्वाच्या राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना उमेदवार निवडीच्या वेळेस तारेवरची कसरत करावी लागणार आहे. अनेक इच्छुक उमेदवार तिकीट मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी करीत आहेत. उमेदवारी मिळविण्याचे हेतूने अनेकांनी पक्ष प्रवेश करून पक्षातील नेत्यांसमोर पुढे-पुढे करणे सुरू केले आहे.

बॉक्स : राजकीय पुढाऱ्यांची सावध भूमिका

या निवडणुकीचा परिणाम आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे पुढारी सावध भूमिका घेत आहेत. तिकीट नाकारल्याने नाराज झालेले उमेदवार पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उपद्रव निर्माण करू शकतात. तसेच या निवडणुकीत जी राजकीय समीकरणे बनातील, याचा मोठा परिणाम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर होणार असल्याने सर्वच पक्षांचे नेते सावध भूमिका घेणार हे उघड आहे. त्यामुळे युती-आघाडी कशी होते, यावरच विजयाचे सूत्र पक्के होणार आहे.