शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

उमरखेड शहरात वाहतुकीचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 10:38 PM

शहराच्या मध्यभागातून नागपूर-बोरी-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळे शहरातील वाहतूक नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी अत्यंत संवेदनशील असतानाही वाहतूक पोलिसांचे प्रचंड दुर्लक्ष आहे. अरुंद रस्त्यांवर मोकाट जनावरांचा कायमच ठिय्या असतो.

ठळक मुद्देअपघाताच्या घटना वाढल्या : वाहतूक पोलीस मात्र बेपत्ता

अविनाश खंदारे।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : शहराच्या मध्यभागातून नागपूर-बोरी-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळे शहरातील वाहतूक नियंत्रित ठेवण्याची जबाबदारी अत्यंत संवेदनशील असतानाही वाहतूक पोलिसांचे प्रचंड दुर्लक्ष आहे. अरुंद रस्त्यांवर मोकाट जनावरांचा कायमच ठिय्या असतो. त्यावरून अहोरात्र अवजड वाहतूक सुरू असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत आहे.शहरातील रस्ते अतिशय अरुंद आहे. त्यातच अनेक रस्त्यांवर अतिक्रमणही वाढले आहे. मुख्य चौकात पोहोचणारे सर्व रस्ते अरुंद आहे. त्यामुळे चौकात येणाऱ्या वाहनांची एकच गर्दी होऊन अपघाताचा धोका वाढतो. मुख्य रस्त्यांना दुभाजक लावलेले आहे. परंतु या रस्त्यावर मोकाट जनावरे ठाण मांडून बसलेली असतात. त्यामुळे दररोजच छोटेमोठे अपघात घडत आहेत. माहेश्वरी चौक, गायत्री चौक, बसस्थानक चौक, नगरपरिषद गार्डन परिसर, महागाव रोड, नांदेड रोड, ढाणकी रोड, पुसद रोड आदी ठिकाणी फेरीवाल्यांनी आपले दुकाने थाटलेली आहे. रस्त्याच्या दुतर्फा हातगाडीवाल्यांनी जागा काबीज केल्या आहे. संभाजी उद्यान ते माहेश्वरी चौक या दरम्यानच्या बोळ वजा अरुंद रस्त्यावर वाहने उभी करण्यास बंदी आहे. तरीही तेथे अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने सर्रास उभी केली जातात. माहेश्वरी चौकाच्या तिहेरी वळणावर अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने सतत उभी असतात. हा सर्व प्रकार पोलिसांना माहिती आहे. तरीही वाहतूक पोलीस गप्प का असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे. अंतर्गत वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे. पेट्रोल पंपापासून विश्रामगृहापर्यंत वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे.सुसाट तरुणांंना लगाम कोण घालणार?उमरखेड शहरातील अनेक तरुण सुसाट वेगाने वाहने चालवितात.परंतु त्यांना आवर घालण्याची जबाबदारी असलेले वाहतूक पोलीस ऐनवेळी बेपत्ता होतात. माहेश्वर चौक, पुसद रोड, महागाव रोड, नांदेड रोड, ढाणकी रोड आदी ठिकाणी वाहतूक पोलिसांची ड्युटी लावली जाते. परंतु विस्कटलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी हे पोलीस कधीच कर्तव्य बजावताना दिसत नाही.

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसAccidentअपघात