शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दिवंगत सुधाकरराव नाईक दूरदृष्टीचे नेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:44 IST

पुसद : माजी मुख्यमंत्रीद्वय दिवंगत वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांनी विभागाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. दिवंगत सुधाकरराव नाईक ...

पुसद : माजी मुख्यमंत्रीद्वय दिवंगत वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांनी विभागाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. दिवंगत सुधाकरराव नाईक दूरदृष्टीचे नेते होते, असे विचार ॲड. आप्पाराव मैंद यांनी व्यक्त केले.

जलसंधारणाचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त खंडाळा येथील विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी अंगणवाडी व ग्रामीण भागातील कुपोषित बालकांना सकस आहार, औषधी व कपडे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी भारती नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. आप्पाराव मैंद होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक, विद्यमान उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, तातू देशमुख, माजी आमदार विजय खडसे, सदबाराव मोहटे, दयाराम चव्हाण उपस्थित होते.

प्रारंभी दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून मानवंदना देण्यात आली. ॲड. आप्पाराव मैंद यांनी अद्याप या भागातील पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे. तो प्रश्न सुटला नाही याचा दोष नेत्यांना देण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी त्यांना सांगून प्रश्न सोडवायला पाहिजे होता, असे मत व्यक्त केले. या ठिकाणी कार्यकर्त्यांची फौज नसल्यामुळे पाण्याचा प्रश्न आजही प्रलंबितच आहे. सुधाकरराव यांच्यात व्हिजन होते. त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी होती. विरोधी लोकांचेसुद्धा ते काम करीत असल्यामुळे त्यांनी लोकांना फिरविण्याचे काम केले नाही. एक सांस्कृतिक वारसा लाभलेले त्यांचे नेतृत्व होते. ते मैत्रीचा धागा जपण्याचे काम करीत होते, असे ॲड. मैंद यांनी सांगितले. प्रास्ताविक बी.जी. राठोड, संचालन मनोहर चव्हाण, तर आभार साहेबराव धबाले यांनी मानले.

कार्यक्रमाला आर.एल. राठोड, सुभाष कांबळे, शीलानंद कांबळे, बाबूसिंग आडे, रमेश मस्के, भीमराव कांबळे, नामदेव मारकड, अवधूत मस्के, नामदेव गडदे, ठाणेदार गोपाल चावडीकर, रवींद्र महल्ले, संतोष मुराई, अनिल चेंडकाळे, डॉ. राहुल दुधे, डॉ. सचिन मस्के, डॉ. दिनेश चव्हाण, डॉ. शरद तातेवार यांच्यासह ४० गाव माळपठार कृती समिती व गावकरी उपस्थित होते.