शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

दहावीची परीक्षा रद्द झाली तरी सतत अभ्यास करीतच राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2021 5:00 AM

दहावीची परीक्षा जूनमध्ये घेणार म्हणून सरकारने सुरुवातीला जाहीर केले. मात्र, नंतर अचानक एप्रिलच्या मध्यातच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. कोरोना स्थितीचा अंदाज घेऊन शासनाला जूनमध्ये निर्णय घेता आला नसता का, असा प्रश्न महाराष्ट्र राज्य प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे विदर्भ विभागीय अध्यक्ष योगीराज अरसोड यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनो गाफील राहू नका : लाॅकडाऊनमधील मेहनत अकरावी - बारावीत उपयोगी पडणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यंदा दहावीच्या परीक्षा शासनाने रद्द केल्या. मात्र, परीक्षा रद्द झाली म्हणून विद्यार्थी गाफील राहिल्यास येत्या काळात त्यांचा मोठा भ्रमनिरास होऊ शकतो. विविध स्तरावरील प्रवेश प्रक्रिया व अन्य स्पर्धा परीक्षांसाठी दहावीच्या विद्यार्थ्यांनी अजूनही अभ्यास करणे आवश्यक असल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे. दहावीची परीक्षा जूनमध्ये घेणार म्हणून सरकारने सुरुवातीला जाहीर केले. मात्र, नंतर अचानक एप्रिलच्या मध्यातच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. कोरोना स्थितीचा अंदाज घेऊन शासनाला जूनमध्ये निर्णय घेता आला नसता का, असा प्रश्न महाराष्ट्र राज्य प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे विदर्भ विभागीय अध्यक्ष योगीराज अरसोड यांनी उपस्थित केला. गुणसुधार परीक्षा होणारचशालेय अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुणपत्रिका दिली जाणार आहे. मात्र, जे विद्यार्थी याबाबत संतुष्ट नसतील, त्यांना गुणसुधार परीक्षेची संधी देण्यात येणार आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांची परीक्षा बोर्ड घेईलच. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांनी अभ्यास करून ठेवणे आवश्यक झाले आहे. जून-जुलैत परीक्षेच्या हालचालीकोरोनामुळे पुढील शैक्षणिक सत्र  वेळेवर सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे कोरोना परिस्थिती निवळल्यानंतर जून किंवा जुलैमध्ये परीक्षा घेण्याच्याही हालचाली सुरू आहेत. अशी परीक्षा झाल्यास आणि अनेक दिवस गाफील राहिलेल्या विद्यार्थ्यांची अडचण होऊ शकते.अकरावीसाठी प्रवेश परीक्षाविद्यार्थी जेव्हा अकरावीसाठी नामांकित महाविद्यालयात प्रवेश घ्यायला जाईल, तेव्हा साहजिकच कोरोनाचा फायदा घेऊन निव्वळ पुढे ढकललेल्या विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षा देऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. शिवाय प्रवेश परीक्षाही होण्याची शक्यता आहे. त्यासाठीही तयारी करावी लागणार आहे.  

हा शैक्षणिक भ्रष्टाचारचज्या विद्यार्थ्यांनी दिवसरात्र एक करून अभ्यास केला, त्यांचे परीक्षा देण्याचे स्वप्न एका क्षणात हवेत विरले. परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे हा शैक्षणिक भ्रष्टाचारच आहे, असे मत महाराष्ट्र राज्य प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे विदर्भ विभागीय अध्यक्ष योगीराज अरसोड यांनी केली.

टॅग्स :ssc examदहावी