शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

पाच तासात ४१० वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST

कोणत्याही वाहन चालकाला कागदपत्रांची विचारणा केली जाते. ते नसेल तर वाहन मुख्यालयात जमा केले जाते. सोमवारी सकाळी ७ ते १२ या पाच तासात तब्बल ४१० दुचाकी व २० चारचाकी वाहने जप्त केली गेली. वाहनधारकांकडून एक लाख २५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला.

ठळक मुद्देचारचाकींचाही समावेश : सव्वालाख रुपयांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वारंवार आवाहन करूनही रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढत आहे. म्हणून पोलिसांनी आता लाठी ऐवजी आर्थिक दंडाचे हत्यार उपसले आहे. कोणत्याही वाहन चालकाला कागदपत्रांची विचारणा केली जाते. ते नसेल तर वाहन मुख्यालयात जमा केले जाते. सोमवारी सकाळी ७ ते १२ या पाच तासात तब्बल ४१० दुचाकी व २० चारचाकी वाहने जप्त केली गेली. वाहनधारकांकडून एक लाख २५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला.स्टेट बँक, बसस्टँड, दत्त चौक, टांगा चौक या प्रमुख चौकात वाहतूक शाखेने कारवाई केली. भाजीपाला, किराणा, दुध अशा चिल्लर वस्तू खरेदीसाठी नागरिक शहराच्या दुसऱ्या टोकाला पोहचले होते. काहींनी २०१४ चे प्रिस्क्रिप्शन दाखवून औषध खरेदीचा तर काहींनी गोळ्या परत करण्याचा बहाणा शोधला.नागरिक म्हणतात, पोलिसांकडे तरी कागदपत्रे सोबत असतात काय?बहुतांश दुचाकी वाहनांची खरेदीचे पहिले वर्ष वगळता पीयूसी घेतली जात नाही. नियमानुसार ती आवश्यक असली तरी त्यासाठी कधी वाहतूक पोलीस कारवाई करीत नाही. शिवाय गाडीची कागदपत्रे वाहनात ठेवली जात नाही, सुरक्षेच्या कारणावरून ती घरी ठेवली जातात. ज्यांची गाडी कर्जाऊ असेल त्यांची कागदपत्रे बँका व वित्तीय संस्थांकडे तारण असतात. ही कागदपत्रे आणायची कोठून असा सर्वसमावेशक सवाल आहे. वाहन चालविण्याचा परवाना प्रत्येकाने खिशात बाळगावा व तो नसेल तर निश्चितच कारवाई करावी, अशी भूमिकाही या व्यावसायिकांनी मांडली आहे. सोमवारी पोलिसांनी लायसन्स, आरसी, इन्शूरन्स एवढेच नव्हे तर पीयूसीची मागणी केली. सर्वांचाच गोंधळ उडाला. काहींना वाहन जप्त झाल्याने पायदळ घरी जावे लागले. पोलीस प्रशासनाने जनतेवर थेट कारवाई करण्याऐवजी आधी आपल्या अधिनस्त सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची अशीच अचानक तपासणी करून त्यांच्याकडे नागरिकांना मागितली जाणारी पीयूसीसह सर्व कागदपत्रे आहेत का याची तपासणी करावी, अशी मागणीही व्यापारी व व्यावसायिकांमधून केली जात आहे.ठोक व्यापारी, व्यावसायिकांमध्ये मात्र रोषपोलिसांनी सोमवारी ४१० वाहने जप्तीची कारवाई केली असली तरी त्या विरोधात शहरातील ठोक व्यापारी, किरकोळ विक्रेते व व्यावसायिकांमध्ये असंतोष दिसला. याच कारवाईवरून टांगाचौक मार्गावरील अनेक ठोक विक्रेत्यांनी सोमवारी दुकानांचे शटर खाली टाकून कायम बंदची भूमिका घेतली होती. किरकोळ विक्रेते साहित्य खरेदीसाठी ठोक विक्रेत्यांकडे जातात. हे ठोक विक्रेते मुख्य बाजारपेठेत असल्याने शहर व परिसरातील कुठल्याही किरकोळ विक्रेत्याला या बाजारपेठेत यावे लागते. त्यातच माल नेण्यासाठी हमाल, सायकलरिक्षा, ऑटोरिक्षा, मालवाहू वाहन मिळत नाही. अशा वेळी दुचाकी वाहनावर माल दुकानापर्यंत नेणे हाच पर्याय असतो. अशा वेळी पोलीस कारवाई करत असतील तर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवायची कशासाठी असा सवाल या विक्रेत्यांकडून उपस्थित केला गेला. अशीच अवस्था दूध विक्रेते, गॅस सिलिंडर आणायला जाणाºयांची झाली आहे. औषधांचेही असेच आहे. ज्या डॉक्टरने औषधी लिहून दिली, त्याच डॉक्टरच्या परिसरातील मेडिकलमध्ये ती औषधी मिळते. त्यामुळे घरापासून दूर या औषध खरेदीसाठी यावेच लागते. त्यात पोलीस कारवाई करीत असल्याने न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.घराजवळच खरेदी करालॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडण्याची सवलत असली तरी नागरिकांनी त्याचा गैरफायदा घेऊन शहरभर भटकू नये, या टोकावरून त्या टोकावर जाऊ नये, त्याऐवजी घराच्या परिसरातच मिळणाºया दुकानांमधून किराणा, भाजी, दूध, औषधी आदी साहित्य घ्यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यामुळे शहरात वाहनांची गर्दी वाढली. वार्डात भाजी विक्रेते फिरत असताना नागरिक खरेदीसाठी मुख्य बाजारपेठेतच येतात. अशांना ब्रेक लावण्यासाठीच जप्तीची ही कारवाई करावी लागली.- सतीश चवरेप्रभारी, जिल्हा वाहतूक शाखा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या