शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

अखेर दूषित पाणी पुरवठा झाला बंद

By admin | Updated: November 19, 2016 01:32 IST

तालुक्यातील घोन्सा येथून बारमाही वाहणाऱ्या विदर्भा नदीच्या पात्रात लगतच असलेल्या कुंभारखणी येथील भूमिगत

पात्र प्रदूषित : कोळसा खाणीतून विदर्भा नदीत सोडले जात होते रसायनयुक्त पाणीवणी : तालुक्यातील घोन्सा येथून बारमाही वाहणाऱ्या विदर्भा नदीच्या पात्रात लगतच असलेल्या कुंभारखणी येथील भूमिगत कोळसा खाणीतील दूषित पाणी सोडण्यात येत होते. याबाबत १६ नोव्हेंबर रोजी ‘वणी तालुक्यातील विदर्भा नदीचे खोरे झाले विषाक्त’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच वेकोलिने दूषित पाणी पुरवठा करणे बंद केले आहे.घोन्साजवळून वाहणाऱ्या विदर्भा नदीच्या पात्रात लगतच्या कुंभारखणी भूमिगत कोळसा खाणीतून निघणारे रसायनयुक्त व दूषित पाणी सोडण्यात येत होते. याबाबत वारंवार ग्रामपंचायतीने वेकोलि प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याची वेकोलितर्फे दखलच घेण्यात आली नाही. त्यामुळे नदी काठावरील गावांना दूषित पाणी प्राशन करावे लागत होते. नदीत सोडण्यात येणाऱ्या या पाण्यामुळे संपूर्ण नदी काळीभोर दिसू लागली होती.या नदीतील पाणी घोन्सा येथे नळाद्वारे सोडण्यात येत होते. त्यामुळे गावकऱ्यांचा आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. गावकऱ्यांचे लक्ष जावू नये म्हणून वेकोलितर्फे रात्रीच्या वेळेला दूषित पाणी सोडण्यात येत होते. गेल्या तीन वर्षांपूर्वीही वेकोलिने अशाच प्रकारे दूषित पाणी सोडणे सुरू केले होते. तेव्हा ग्रामस्थांच्या तक्रारीवरून या पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. मात्र आता पुन्हा वेकोलिने हेच दूषित पाणी सोडणे सुरू केल्यामुळे अख्या गावाचे आरोग्य धोक्यात सापडले होते.याबाबत ‘लोकमत’ने बुधवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तामुळे वेकोलि प्रशासनात चांगलीच खळबळ माजली व लगेच वृत्ताची दखल घेऊन वेकोलिमधून सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्याचा पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे आता नदीला जीवनदा मिळण्याची शक्यता आहे. खाणीतून सोडण्यात येणारे हे पाणी वेकोलिने फिल्टर करून सोडावे, अशी मागणी आहे. (कार्यालय प्रतिनिधी)