शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

महाविद्यालयीन प्रवेशाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; पाच जिल्ह्यातील ४०० महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 3:32 PM

कोरोनाच्या संकटामुळे शैक्षणिक घडी विस्कटल्याने त्याचा परिणाम महाविद्यालयीन प्रवेशावर झाला आहे.

यवतमाळ : चालु शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशाकरिता ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्वपुर्ण निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आला. या निर्णयामुळे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यातील ४०० महाविद्यालये आणि हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

कोरोनाच्या संकटामुळे शैक्षणिक घडी विस्कटल्याने त्याचा परिणाम महाविद्यालयीन प्रवेशावर झाला आहे. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या पार पडलेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी परिषदेचे सदस्य वसंत घुईखेडकर यांच्यासह ईतर सदस्यांनी प्रवेशाला मुदतवाढ देण्याची मागणी केली. त्यानंतर त्याला कुलगुरुंनी मान्यता दिल्याचे सांगण्यात आले.

दरवर्षी महाविद्यालयीन प्रवेशासाठी आँगष्ट महीन्याच्या पहील्या सोमवारपर्यंत मुदत असते. परंतु यावर्षी मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अद्याप शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आले नाही. त्याचबरोबर ईतरही शैक्षणिक कामकाज अडचणीत आले आहे. ही परिस्थिती बघता चालू शैक्षणिक सत्राकरिता विद्यापीठाने प्रवेशासाठी आगोदरच ३१ आँगष्टपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर सुध्दा विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे महाविद्यालयात नवीन प्रवेशाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांकडून मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. याबाबत विद्यापीठ व्यवस्थापण परिषदेच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर कुलगुरुंनी प्रवेशाकरिता ३० सप्टेंबरपर्यंत वाढ करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली. विद्यापीठाच्या उपकुलसचिवांनी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांना पत्राद्वारे मुदतवाढीचा निर्णय कळविला.

कोरोनाच्या संकटामुळे शैक्षणिक कामकाजावर परिणाम झाला. महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रियासुध्दा रखडली होती. विद्यापीठाने प्रवेशाची मुदत वाढविल्याने चांगला फायदा होईल.- वसंत घुईखेडकर, सदस्य, अमरावती विद्यापीठ व्यवस्थापन परिषद

टॅग्स :YavatmalयवतमाळStudentविद्यार्थीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcollegeमहाविद्यालय