शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्रांवर वाढला अतिरिक्त दाब

By admin | Updated: November 30, 2014 23:14 IST

खरिपातील नैसर्गिक आपत्तीतून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच भारनियमन आणि कमी दाबाच्या विजेमुळे रबी पिकालाही जबरदस्त फटका बसत आहे. गहू, हरभरा आदी पिकांना पाणी देण्याची मोठी समस्या आहे.

नेर : खरिपातील नैसर्गिक आपत्तीतून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच भारनियमन आणि कमी दाबाच्या विजेमुळे रबी पिकालाही जबरदस्त फटका बसत आहे. गहू, हरभरा आदी पिकांना पाणी देण्याची मोठी समस्या आहे. शिवाय फळबागांसाठीही धोक्याची घंटा ठरत आहे. यावर विद्युत कंपनीकडून कुठलीही उपाययोजना होत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
तालुक्यात निर्धारित वेळेशिवायसुद्धा इतरवेळी भारनियमनाच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित केला जातो. जेव्हा वीज असते तीही कमी दाबाची राहात असल्याने मोटरपंप चालत नाही. शिवाय काही प्रसंगी जळत असल्याने दुहेरी नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना खरीप हंगामात लागवड खर्चाइतकेही उत्पादन झाले नाही. त्यामुळे वर्षभर कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा आणि घेतलेले कर्ज फेडायचे कसे याची चिंता लागली आहे. आता रबीचे पीक घेवून यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न होत असतानाच वीज मंडळाचे भारनियमन आणि कमी दाबाच्या विजेचे भूत मानगुटीवर बसले आहे.
तालुक्यात गहू, हरभरा, भाजीपाला पिकाचे मोठे क्षेत्र आहे. शिवाय फळबागाही आहे. या पिकांना सद्यस्थितीत पाणी देण्याची अतिशय आवश्यकता आहे. परंतु दिवसभर विजेचा लपंडाव सुरू राहात असल्याने काही शेतकऱ्यांना ओलितासाठी रात्र जागावी लागते. या स्थितीत वन्य जीवांपासूनही त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
क्षमतेपेक्षा जास्त विद्युत जोडण्या असल्याने बऱ्याच रोहित्रांवर अतिरिक्त दाब येत असल्याने पुरवठा सुरळीत ठेवण्यात ते अकार्यक्षम ठरत आहे. परिणामी कृषी पंप जळण्याचे प्रकार वाढले आहे. मोटरपंपाच्या संख्येनुसार नवीन रोहित्र बसविणे गरजेचे आहे. परंतु यासाठी अनेक अडचणी विद्युत कंपनीकडून सांगितल्या जात आहे. शिवाय छोटासा बिघाड काढण्यासाठीही कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना सहकार्य मिळत नाही. अशावेळी त्यांना स्वत:च्या खिशातून खर्च भागवावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
विजेसंबंधीचे प्रश्न तत्काळ निकाली काढावे, या मागणीसाठी विद्युत कंपनीला निवेदन देण्यात आले. यावर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी स्नेहल भाकरे, निखिल जैत, प्रवीण राठोड, सुजित कुंभारे, विशाल चहाकार, गोपाळ चव्हाण, लक्ष्मण कराळे, शंकर चव्हाण, संजय राठोड, किशोर अरसोड, विलास चव्हाण, पंडित चव्हाण आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)