शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

वणी उपविभागात पिकांचे नुकसान लाखो रुपयांचे, मदत मात्र हजारांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2021 5:00 AM

गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक संकटांचा सामना करीत असल्याने मेटाकुटीस आला आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार वणी तालुक्यात ३४ हजार २१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील ७ महसूल मंडळांत अतिवृष्टी, तर शिंदोला व पुनवट मंडळांतील पिकांना सततच्या पावसाचा मोठा फटका बसला. कृषी व महसूल विभागाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल तयार केला. शुक्रवारी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी २३ कोटी २६ लाखांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे पीक बुडाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र आता हेक्टरी केवळ ६ हजार ८०० रुपये देण्याचा घाट घालण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक संकटांचा सामना करीत असल्याने मेटाकुटीस आला आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार वणी तालुक्यात ३४ हजार २१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील ७ महसूल मंडळांत अतिवृष्टी, तर शिंदोला व पुनवट मंडळांतील पिकांना सततच्या पावसाचा मोठा फटका बसला. कृषी व महसूल विभागाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल तयार केला. शुक्रवारी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी २३ कोटी २६ लाखांची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदविली आहे. यंदा सप्टेंबर महिन्याअगोदर पिकांची स्थिती अतिशय चांगली होती. मात्र त्यानंतर आलेल्या पावसाने पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. वणी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणीही विविध राजकीय पक्षांकडून करण्यात आली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपयांची मदत करावी, अशा मागणीचे निवेदनही प्रशासन व शासनाला देण्यात आले. मात्र ही मागणी अव्हेरून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांची मदत शासनाकडून दिली जाणार आहे. या अल्प मोबदल्यात आम्ही जगावे कसे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

बोंडसडीनंतर कपाशीवर आता लाल्याचा प्रकोप- सततच्या पावसाने कपाशीची बोंडे सडली, तर सोयाबीनला अंकुर फुटले. या संकटातून शेतकरी सावरत नाही, तोच आता उरल्यासुरल्या कपाशीवर हळूहळू लाल्या रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी हादरून गेला आहे. यामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती