शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

निराधार, वृद्धांची परवड अद्याप सुरूच

By admin | Updated: May 30, 2015 02:33 IST

येथील तहसील कार्यालयाकडून तालुक्यातील निराधार, वृद्धांची परवड अद्याप सुरूच आहे. तहसीलच्या भोंगळ कारभाराने या निराधारांचे कित्येक वर्षांपासूनचे अर्ज गहाळ झाले.

दोषी मोकाटच : पाच महिन्यांपासून छदामही नाही, तहसीलमधून कागदपत्रे झाली गहाळ, वृद्ध मारतात दररोज तहसीलचे हेलपाटेमारेगाव : येथील तहसील कार्यालयाकडून तालुक्यातील निराधार, वृद्धांची परवड अद्याप सुरूच आहे. तहसीलच्या भोंगळ कारभाराने या निराधारांचे कित्येक वर्षांपासूनचे अर्ज गहाळ झाले. परिणामी गेल्या पाच महिन्यांपासून ७६० निराधार, वृद्ध लाभार्थ्यांना छदामही मिळाला नाही. तथापि त्यांचे गर्ज गहाळ होण्यास कारणीभूत ठरलेले संबंधित कर्मचारी अद्याप मोकाटच आहेत. नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची दखल घेण्याची गरज आहे.येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना विभाग आहे. त्यातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेपर्वा वृत्तीने निराधार, वृद्धांचे अनुदान अर्ज व कार्यालयातील दप्तरच पाच महिन्यांपासून गहाळ झाले. मात्र कार्यालयातून महत्त्वाचे दस्तऐवज गहाळ होऊन अथवा चोरी जाऊही त्याबाबत साधी पोलिसांत तक्रार करण्यात आली नाही. तथापि अर्ज गहाळ झाल्याने विविध योजनाअंतर्गत अनुदानाचा लाभ घेणारे ७६० निराधार लाभार्थ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून छदामही मिळाला नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. हे निराधार, वृद्ध प्रचंड आक्रोश करीत आहे. मात्र त्यांचा आवाज कुणालाच ऐकू जात नाही.शासनाने निराधार, वृद्धांना आधार देण्यासाठी सन १९८० पासून संजय गांधी निराधार योजना सुरू केली. त्यात वेळोवेळी सुधारणा झाली. त्यानुसार संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवत्तीवेतन योजना गट ‘अ’ आणि गट ‘ब’, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजनांतर्गत या निराधार, वृद्धांना अनुदान देण्यात येते. या योजनांचे तालुक्यात दोन हजारांच्यावर लाभार्थी आहेत. दरमहा प्रत्येकी ६०० रूपयांप्रमाणे त्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाते. मात्र सतत बदलते कर्मचारी, प्रभारी अधिकाऱ्यांच्या बेपर्वा वृत्तीने येथील कामात अनियमितता आली. संबंधित कर्मचारी बेपर्वा असल्याने संगणकीय याद्यांतून अनेकांची नावे सुटू लागली. मृतक लाभार्थ्यांच्या नावाने अनुदान पाठविले जाऊ लागले. एकूणच मनमानी कारभारामुळे येथील हा विभाग आता प्रचंड चचेचा विषय ठरला आहे. सहा महिन्यांपूर्वी विभागात लाभार्थ्यांचे अर्ज क्रमवार लावणे, रेकार्ड अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळी तब्बल ७६० निराधार, वृद्धांचे अर्ज गहाळ झाल्याचे दिसून आले. मात्र तरीही संबंधित कर्मचारी बिनधास्त होते. तथापि लाभार्थी मात्र हवालदिल झाले. कारण जानेवारी २०१५ पासून त्यांचे अनुदानच बंद झाले. तत्पूर्वी आॅक्टोबर २०१४ पासून काही लाभार्थी अनुदानापासून वंचित होते. तरीही अधिकारी, कर्मचारी लाभार्थ्यांना माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते. सदर प्रतिनिधीने या बीबंचा पाठपुरावा केला. त्यानंतर कुठे अनुदानापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांसाठी मडळनिहाय शिबिरे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार काही शिबिरे आता घेण्यात आली. मात्र त्यांची प्रकरणे तयार करण्यासाठी आणखी किमान एक ते दीड महिनयांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत उन्हामुळे काही लाभार्थी कदाचित शेवटचा श्वास घेतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या योजनेचे जिल्हास्तरीय संनियंत्रण अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी आहे. त्यांनीही या गंभीर बाबीकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे वृद्ध व निराधार लाभार्थी संताप व्यक्त करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)