शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

बेंबळाच्या पाण्याला ‘मे’चे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:26 IST

बेंबळा प्रकल्पाचे पाणी यवतमाळात मे महिन्यात आणने प्रशासनापुढे तगडे आव्हान आहे. या योजनेच्या कामाची आजची स्थिती आणि गती पाहता झालेली घोषणा फोल ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

ठळक मुद्देरात्र कमी, सोंग फार : राणीअमरावती, गळव्हा, भिसनी ते टाकळीतून निघाला पाईपलाईनचा मार्गघोषणा फोल ठरण्याची चिन्हेजॅकवेल व सम्प निर्माणाधीनचब्लास्टिंग करून खोदकामनाल्यांतून जातो मार्ग

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बेंबळा प्रकल्पाचे पाणी यवतमाळात मे महिन्यात आणने प्रशासनापुढे तगडे आव्हान आहे. या योजनेच्या कामाची आजची स्थिती आणि गती पाहता झालेली घोषणा फोल ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहे. पाणी येण्याच्या तारखा जाहीर करताना वास्तव नजरेआड केले जात असल्याचे दिसून येते. टाकलेल्या पाईप लाईनच्या किलोमीटरची प्रत्यक्ष स्थिती अंधारात ठेवली आहे. शिवाय जॅकवेल, फाऊंडेशन, सम्प ही कामे मजबूत होण्यासाठी लागणारा अवधी गृहीत धरला असावा की नाही, हा सुध्दा संशोधनाचा विषय आहे. प्रस्तुत प्रतिनिधीच्या प्रत्यक्ष पाहणीतील हे वास्तव आहे.प्रकल्पावरील जॅकवेलपासूनच जवळपास १०० मीटरपर्यंत पाईप टाकायचे आहे. रस्ता, शेतातून मार्ग काढत निघालेली एक हजार मीमी व्यासाची पाईप लाईन राणीअमरावती गावात थांबली. या ठिकाणी नदीतून मार्ग काढायचा आहे. अनेक गावांचा मार्ग फोडायचा आहे. ब्रेक झालेली लाईन गळव्हा गावापर्यंत पोहोचली. बहुतांश लाईन शेतातून गेली. बेंबळाच्या लघु कालव्याच्या काठाकाठाने लाईन काढताना मूळ मार्गात थोडा बदलही करावा लागला. एका शेतात बेंड करून दिशा बदलवीली गेली. तेथून भिसनी गावाकडे निघालेली पाईपलाईन टाकताना जेसीबीसुध्दा हरला. या भागात खोदकाम करताना अक्षरश: ब्लास्टिंग करावे लागले. पुढे कालवा आणि नाल्याशी सामना करावा लागला. टाकळीच्या दिशेने निघालेले पाईप जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी किमान तीन किलोमीटर शिल्लक राहिले आहे.बेंबळा प्रकल्पावरील जॅकवेल ते टाकळी जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत १९ किलोमीटर पाईप टाकायचे आहे. दिशा बदलविल्याने यातील दीड ते दोन किलोमीटर कमी झाले. तरीही १७ किलोमीटरचा पल्ला गाठायचा आहे. १२ किलोमीटरच लाईन टाकल्याचा दावा केला जात आहे. मात्र मध्ये ब्रेक झाला याचा हिशेब धरला नसावा. आज किमान सात किलोमीटर पाईप टाकायचे आहे. दिवसभरात सहा मीटरचे साधारणत: ३० पाईप टाकले जात आहे. दिवसभरात १८० मीटर काम होत आहे. एक किलोमीटरसाठी सहा दिवसांचा कालावधी लागतो. हा ढोबळ हिशेब केल्यास सात किमीसाठी ४२ दिवस निश्चित आहे. कडक जमीन, नाल्यातून मार्ग असल्यास पाईप टाकण्याची गती मंदावते. शुध्दीकरण केंद्रावरचा मार्ग पहाडातून जातो. या परिस्थितीत दोन महिन्यात टाकळीपर्यंत पाईपलाईन होईल, हे स्वप्नवतच आहे.पाईपलाईन टाकण्याचे काम चार चमू करत आहे. यात वाढ आणि दिवस-रात्र काम केल्यास कामाची गती वाढून लागणारा कालावधी कमी होऊ शकतो, असे मत व्यक्त केले जात आहे. गती वाढली तरच यवतमाळकरांना पावसाळ्यापूर्वी मिळेल...कामाची गती अन् मनुष्यबळ वाढविल्यास कमी होऊ शकतो कालावधीटाकळी ते निळोणाचाही वांदाटाकळीपर्यंत पोहोचलेले पाणी निळोणा आणि चापडोह जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी ८०० मीमीची पाईप लाईन टाकली जाणार आहे. हे अंतर साडेआठ किलोमीटर आहे. टाकळी फाटा ते लकडगंज एवढीच पाईप लाईन पडली आहे. जवळपास चार किलोमीटर आणि तोही शहरातून जाणारा भाग आहे. दिवसभरात दोन ते तीन पाईप टाकल्याचा शहरवासीयांचा अनुभव आहे.३३ केव्हीची वीजपाणी ओढण्यासाठी ३३ केव्हीची वीज यंत्रणा उभारली जात आहे. यासाठी ४० वीज खांब टाकले जात आहे. यातील काही काम पूर्ण झाले आहे. ट्रान्सफार्मर पोहोचले आहे. मात्र मोठमोठ्या मोटर लावण्यासाठी फाऊंडेशनच्या कामाला मात्र हात लागलेला नाही. बांधकाम करून त्याला मजबुतीसाठी आवश्यक तेवढा वेळ द्यावा लागणार आहे. अर्थात चांगले क्युरीन होणे गरजेचे आहे. त्यामुळे या कामालाही अवधी लागणार आहे.तहसील चौकात काँक्रिट रस्ता फुटणारमेनलाईनमधून निघालेली पाईप लाईन सिमेंट रोडखालून बोगदा करून पुढे नेण्याची योजना होती. मात्र कारागृह विभागाने परवानगी नाकारली. आता याठिकाणी बोगदा करण्यासाठी मशीन लागू शकत नाही. त्यामुळे आता रस्ता फोडून मार्ग काढला जाणार आहे. पालिकेने यासाठी परवानगी दिल्याची माहिती आहे.