शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
3
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
4
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
5
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
6
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
7
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
8
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
9
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
10
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
11
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
12
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
13
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
14
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
15
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
16
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
17
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
18
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
19
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

बेंबळाच्या पाण्याला ‘मे’चे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:26 IST

बेंबळा प्रकल्पाचे पाणी यवतमाळात मे महिन्यात आणने प्रशासनापुढे तगडे आव्हान आहे. या योजनेच्या कामाची आजची स्थिती आणि गती पाहता झालेली घोषणा फोल ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

ठळक मुद्देरात्र कमी, सोंग फार : राणीअमरावती, गळव्हा, भिसनी ते टाकळीतून निघाला पाईपलाईनचा मार्गघोषणा फोल ठरण्याची चिन्हेजॅकवेल व सम्प निर्माणाधीनचब्लास्टिंग करून खोदकामनाल्यांतून जातो मार्ग

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बेंबळा प्रकल्पाचे पाणी यवतमाळात मे महिन्यात आणने प्रशासनापुढे तगडे आव्हान आहे. या योजनेच्या कामाची आजची स्थिती आणि गती पाहता झालेली घोषणा फोल ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहे. पाणी येण्याच्या तारखा जाहीर करताना वास्तव नजरेआड केले जात असल्याचे दिसून येते. टाकलेल्या पाईप लाईनच्या किलोमीटरची प्रत्यक्ष स्थिती अंधारात ठेवली आहे. शिवाय जॅकवेल, फाऊंडेशन, सम्प ही कामे मजबूत होण्यासाठी लागणारा अवधी गृहीत धरला असावा की नाही, हा सुध्दा संशोधनाचा विषय आहे. प्रस्तुत प्रतिनिधीच्या प्रत्यक्ष पाहणीतील हे वास्तव आहे.प्रकल्पावरील जॅकवेलपासूनच जवळपास १०० मीटरपर्यंत पाईप टाकायचे आहे. रस्ता, शेतातून मार्ग काढत निघालेली एक हजार मीमी व्यासाची पाईप लाईन राणीअमरावती गावात थांबली. या ठिकाणी नदीतून मार्ग काढायचा आहे. अनेक गावांचा मार्ग फोडायचा आहे. ब्रेक झालेली लाईन गळव्हा गावापर्यंत पोहोचली. बहुतांश लाईन शेतातून गेली. बेंबळाच्या लघु कालव्याच्या काठाकाठाने लाईन काढताना मूळ मार्गात थोडा बदलही करावा लागला. एका शेतात बेंड करून दिशा बदलवीली गेली. तेथून भिसनी गावाकडे निघालेली पाईपलाईन टाकताना जेसीबीसुध्दा हरला. या भागात खोदकाम करताना अक्षरश: ब्लास्टिंग करावे लागले. पुढे कालवा आणि नाल्याशी सामना करावा लागला. टाकळीच्या दिशेने निघालेले पाईप जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी किमान तीन किलोमीटर शिल्लक राहिले आहे.बेंबळा प्रकल्पावरील जॅकवेल ते टाकळी जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत १९ किलोमीटर पाईप टाकायचे आहे. दिशा बदलविल्याने यातील दीड ते दोन किलोमीटर कमी झाले. तरीही १७ किलोमीटरचा पल्ला गाठायचा आहे. १२ किलोमीटरच लाईन टाकल्याचा दावा केला जात आहे. मात्र मध्ये ब्रेक झाला याचा हिशेब धरला नसावा. आज किमान सात किलोमीटर पाईप टाकायचे आहे. दिवसभरात सहा मीटरचे साधारणत: ३० पाईप टाकले जात आहे. दिवसभरात १८० मीटर काम होत आहे. एक किलोमीटरसाठी सहा दिवसांचा कालावधी लागतो. हा ढोबळ हिशेब केल्यास सात किमीसाठी ४२ दिवस निश्चित आहे. कडक जमीन, नाल्यातून मार्ग असल्यास पाईप टाकण्याची गती मंदावते. शुध्दीकरण केंद्रावरचा मार्ग पहाडातून जातो. या परिस्थितीत दोन महिन्यात टाकळीपर्यंत पाईपलाईन होईल, हे स्वप्नवतच आहे.पाईपलाईन टाकण्याचे काम चार चमू करत आहे. यात वाढ आणि दिवस-रात्र काम केल्यास कामाची गती वाढून लागणारा कालावधी कमी होऊ शकतो, असे मत व्यक्त केले जात आहे. गती वाढली तरच यवतमाळकरांना पावसाळ्यापूर्वी मिळेल...कामाची गती अन् मनुष्यबळ वाढविल्यास कमी होऊ शकतो कालावधीटाकळी ते निळोणाचाही वांदाटाकळीपर्यंत पोहोचलेले पाणी निळोणा आणि चापडोह जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी ८०० मीमीची पाईप लाईन टाकली जाणार आहे. हे अंतर साडेआठ किलोमीटर आहे. टाकळी फाटा ते लकडगंज एवढीच पाईप लाईन पडली आहे. जवळपास चार किलोमीटर आणि तोही शहरातून जाणारा भाग आहे. दिवसभरात दोन ते तीन पाईप टाकल्याचा शहरवासीयांचा अनुभव आहे.३३ केव्हीची वीजपाणी ओढण्यासाठी ३३ केव्हीची वीज यंत्रणा उभारली जात आहे. यासाठी ४० वीज खांब टाकले जात आहे. यातील काही काम पूर्ण झाले आहे. ट्रान्सफार्मर पोहोचले आहे. मात्र मोठमोठ्या मोटर लावण्यासाठी फाऊंडेशनच्या कामाला मात्र हात लागलेला नाही. बांधकाम करून त्याला मजबुतीसाठी आवश्यक तेवढा वेळ द्यावा लागणार आहे. अर्थात चांगले क्युरीन होणे गरजेचे आहे. त्यामुळे या कामालाही अवधी लागणार आहे.तहसील चौकात काँक्रिट रस्ता फुटणारमेनलाईनमधून निघालेली पाईप लाईन सिमेंट रोडखालून बोगदा करून पुढे नेण्याची योजना होती. मात्र कारागृह विभागाने परवानगी नाकारली. आता याठिकाणी बोगदा करण्यासाठी मशीन लागू शकत नाही. त्यामुळे आता रस्ता फोडून मार्ग काढला जाणार आहे. पालिकेने यासाठी परवानगी दिल्याची माहिती आहे.