शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
4
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
5
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
6
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
7
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
8
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
9
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
10
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
11
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
12
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
13
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
14
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
15
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
16
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
17
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
18
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
19
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
20
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
Daily Top 2Weekly Top 5

वणी तालुक्यात पुन्हा बोंडअळीचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

वणी तालुक्यात ४३ हजार ३५० हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला आहे. यावर्षी कपाशी पिकाची स्थिती अतिशय उत्तम होती. मात्र कापूस फुटण्याच्या काळातच या भागात परतीच्या पावसाचे आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. मुळात परतीच्या पावसामुळे कपाशीवर फवारणी करणे गरजेचे होते.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचा परिणाम : शेतकऱ्यांना बसणार लाखो रुपयांचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : कापसाचे बोंड पोखरून खाणाºया गुलाबी अळीचा पुन्हा एकदा वणी तालुक्यात प्रकोप झाल्याने शेतकरी हादरले आहेत. सरासरी दोन वेचे झाल्यानंतरही कपाशीच्या झाडाला मोठ्या प्रमाणावर बोंड असून ही बोंडअळी आता सर्व कापसाचे पीक उद्ध्वस्त करण्याची भीती निर्माण झाली आहे.वणी तालुक्यात ४३ हजार ३५० हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला आहे. यावर्षी कपाशी पिकाची स्थिती अतिशय उत्तम होती. मात्र कापूस फुटण्याच्या काळातच या भागात परतीच्या पावसाचे आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. मुळात परतीच्या पावसामुळे कपाशीवर फवारणी करणे गरजेचे होते. परंतु कापसाची वेचणी करायची की फवारणी करायची, या द्विधा मनस्थितीत शेतकऱ्यानी कापसाची वेचाई करणेच पसंत केले. त्यामुळे फवारणी मागे पडली. परिणामी आठ दिवसांपूर्वी वणी तालुक्यात गुलाबी बोंडअळीने ‘दस्तक’ दिला. ही बोंडअळी वेगाने पसरत असून जवळपास सर्वच शेतांमध्ये कमी-अधिक प्रमाणात या अळीने आक्रमण केले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी आनंद बदखल यांनी ‘लोकमत’ला दिली. मागीलवर्षीदेखील याच काळात गुलाबी बोंडअळीचे आक्रमण झाले होते. मात्र त्याचे प्रमाण कमी होते. यंदा दोन वेचापर्यंत अतिशय उत्तम प्रतिचा कापूस शेतकऱ्याच्या हाती आला. त्याला सीसीआयकडून भावही चांगला मिळाला. तोवर गुलाबी बोंडअळीचा शिरकाव झाला नव्हता. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन होईल, या अपेक्षेत शेतकरी होता. परंतु आठ दिवसांपूर्वी बोंडअळीचा शिरकाव होऊन ही बोंडअळी वेगाने कपाशीवर अतिक्रमण करित असल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे. त्यामुळे सरासरी २५ टक्के फटका बसण्याची भीती आनंद बदखल यांनी बोलून दाखविली.बोंडअळीला रोखण्यासाठी वेळोवेळी फवारणी करण्याची गरज असते. परंतु परतीच्या पावसाने घातलेला धुमाकुळाने शेतकऱ्याना फवारणी करण्याची उसंतच दिली नाही. परिणामी याच काळात बोंडअळ्यांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती झाली. बी.टी.बियाणांवर किमान १०० दिवस व्यवस्थित संगोपन केल्यास कपाशीला कोणताही धोका नसतो. परंतु १०० दिवसानंतर हाच बी.टी.कापूस सर्वसाधारण कापूस होतो. यातील बी.टी.चे जिवाणू नैसर्गीकरित्या नष्ट होतात. त्याचमुळे रोगांच्या आक्रमणाची भीती निर्माण होते. यंदाही नेमके तेच झाले आहे. कापसावर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने शेतकºयांना लाखोचा फटका बसणार आहे.कृषी विभाग म्हणतो, कपाशी नष्ट कराकृषी विभागाच्या मते मोठ्या प्रमाणावर बोंडअळीचे आक्रमण झाले असून तिला थोपवणे अशक्य दिसत आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे ओलित आहे, त्यांनी तातडीने कपाशीचे पीक नष्ट केले पाहिजे. त्यामुळे पुढीलवर्षी बोंडअळीपासून दिलासा मिळू शकतो.

टॅग्स :Farmerशेतकरी