शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बोगस बीटी बियाणे दाखल

By admin | Updated: May 28, 2014 00:01 IST

केंद्रीय कृषी मंत्रालयाची परवानगी मिळण्यापूर्वीच बीजी-३ हे बोगस बीटी बियाणे चोरट्या मार्गाने यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाले आहे. याबाबत कृषी खाते अनभिज्ञ नाहीत. मात्र त्यांच्याकडून

कारवाईचा केवळ देखावा :

यवतमाळ : केंद्रीय कृषी मंत्रालयाची परवानगी मिळण्यापूर्वीच बीजी-३ हे बोगस बीटी बियाणे चोरट्या मार्गाने यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाले आहे. याबाबत कृषी खाते अनभिज्ञ नाहीत. मात्र त्यांच्याकडून कारवाईचा केवळ देखावा निर्माण केला जात आहे. जिल्हा परिषदेचा कृषी विभाग बोगस बीटी विक्रेत्यांच्या दावणीला बांधला गेला आहे.

नामांकित कंपनीचे बीजी-३ हे बियाणे सध्या प्रयोगावर आहे. बीजी-१ मध्ये हिरव्या बोंड अळीला प्रतिबंध घालणारे जिन्स टाकण्यात आले होते. बीजी-२ मध्ये सर्व बोंड अळ्यांना मारणारे जिन्स होते. आता बीजी-३ हे नवीन कॉटन बियाणे प्रयोगावर आहे. हे बियाणे पेरल्यानंतर त्यावर तणनाशक फवारता येईल. त्यामुळे पर्‍हाटी जळणार नाही, असा दावा केला जात आहे. मजुरांच्या अडचणीवर मात करणारे हे बियाणे राहणार आहे. सध्या प्रयोगावर असल्याने केंद्र शासनाने अद्याप बीजी-३ या बियाण्याला मंजुरी दिलेली नाही. या प्रक्रियेला आणखी किमान दोन वर्ष लागण्याची शक्यता कृषी सूत्रांनी वर्तविली. मात्र मंजुरीपूर्वीच गुजरात व आंध्रप्रदेशात बीजी-३ हे कपाशीचे बियाणे अवैधरीत्या यवतमाळ जिल्ह्यात आणले जात आहे. मंजुरी न मिळाल्याने हे बियाणे कृषी खात्याच्या दृष्टीने बोगस म्हणून गणले जात आहे. यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव तालुका आणि बहुतांश पांढरकवडा, वणी, झरी, मारेगाव, घाटंजी या तालुक्यात बोगस बीटी बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारले जात आहे. एक हजार रुपयात या बीटी बियाण्याचे पॅकेटस् मिळत आहे. तणनाशक मारावे लागणार नाही आणि मारले तरी पर्‍हाटी जळणार नाही अशी भलावण शेतकर्‍यांची केली जात आहे. शेतकरी वर्ग त्याला बळी पडत आहे. परंतु सांगितलेल्या दाव्याची कोणतीही हमी नाही.

या बोगस बीटी बियाण्याचे आंध्रप्रदेशात आणि बुलडाणा जिल्ह्यात पुरवठादार आहेत. पाटणबोरी भागातील काही कृषी केंद्रातून आणि बाभूळगाव तालुक्यातील काही कृषी केंद्रातून या बोगस बीटी बियाण्यांची विक्री केली जात असल्याची माहिती कृषी खात्याला मिळाली आहे. पांढरकवडा येथे विक्रेत्याच्या घरी या बियाण्याचा साठा आहे. तेथूनच खबरदारी घेऊन या बियाण्याची विक्री व इतर कृषी केंद्रांना पुरवठा केला जात आहे. एकट्या वणी-पांढरकवडा विभागात २0 ते २५ हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर या बोगस बीटीची लागवड केली जाणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यात आधीच सोयाबीनचे बोगस बियाणे विकले जात आहे. तीन हजार रुपये क्विंटलचे सोयाबीन घेऊन थेट नामांकित कंपन्यांच्या बॅगमध्ये भरुन आठ हजार रुपये क्विंटलने विकले जात आहे. त्यावर कोणतीही प्रक्रिया केलेली नाही किंवा त्याची उगवण क्षमता तपासली गेलेली नाही. हा काळाबाजार सुरू असतानाच आता कपाशीच्या बोगस बीटी बियाण्यांची विक्री सुरू असल्याची बाब पुढे आली.

जिल्हा परिषदेचा कृषी विभाग मात्र या बोगस बियाण्यांबाबत धृतराष्ट्राची भूमिका घेत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)