शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बोगस डॉक्टरांकडून चष्मे विक्रीचा गोरखधंदा

By admin | Updated: September 15, 2014 00:25 IST

तालुक्यातील ग्रामीण जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत बाहेर जिल्ह्यातील बोगस नेत्र चिकित्सक डॉक्टराची टोळी सक्रिय होऊन शिबिराच्या नावावर ग्रामीण भागातील रुग्णांच्या मस्तकी चष्मा देण्याचा

सुधाकर अक्कलवार ल्ल घाटंजी घाटंजी : तालुक्यातील ग्रामीण जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत बाहेर जिल्ह्यातील बोगस नेत्र चिकित्सक डॉक्टराची टोळी सक्रिय होऊन शिबिराच्या नावावर ग्रामीण भागातील रुग्णांच्या मस्तकी चष्मा देण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.प्रथमत:च निसर्गाच्या लहरीपणाने मेटाकुटीस आलेल्या ग्रामीण रुग्णांच्या जिवाशी बाहेर जिल्ह्यातील बोगस डॉक्टर येऊन फसगत करत आहे. कोणतीही शासकीय आरोग्य विभागाची परवानगी नसताना खेडोपाडी जाऊन स्थानिक एखाद्या इसमाला हाताशी धरून खुलेआम शिबिर लावून त्यात मनमानी तपासणी फी आकारत आहे. त्यानंतर चष्म्याची आवश्यकता आहे असे सांगत वाटेल तसे ३०० ते ६०० रुपयापर्यंत चष्मा घ्यावयास भाग पाडत आहे. यात ग्रामीण जनतेची चांगलीच फसगत झाल्याची चर्चा असून आरोग्य विभाग मात्र गप्प बसले आहे. तालुक्याबाहेरील आकपुरी, येळाबारा येथे हा गोरखधंदा चालविल्यानंतर या टोळीने घाटंजी तालुक्यातील हिवरधरा, मोवाडा, किन्ही येथे शिबिर घेतले. या दरम्यान चांगलीच रुग्णांची फसगत झाल्याची चर्चा असून कोणत्याही प्रकारची पक्की पावती देत नसल्याचे बोलल्या जात आहे. नेत्र हा मानवी शरीराचा गरजवंत अवयव असतानासुद्धा आम्ही एका संस्थेकडून जनसेवा करीत असल्याची बतावणी करीत खुलेआम ग्रामीण जनतेचा पैसा उकळत आहे. तर बहुतांश रुग्णांकडून तुमच्या नंबरचा चष्मा बनवून आणतो असे सांगून अ‍ॅडव्हांस पैसे काढून नेत आहे. या बाबत काही सुज्ञ नागरिकांनी विचारले असता ते आपल्या खास शैलीत सांगून आम्हाला आपण विचारणार कोण, आम्हाला वरिष्ठांची परवानगी आहे. आपण आम्हाला अडथळा निर्माण केल्यास महागात पडेल असे बोलत असल्याचे सुज्ञ नागरिक फालतू भानगडीत का पडायचे या विवंचनेत वावरत असल्याने या बोगस डॉक्टरांचा चांगलाच जम बसला असून हा प्रकार नेमका काय असावा या बाबत खुलासा करण्यास दुजावत आहे. या शिबिरादरम्यान आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी नसल्याने या शिबिरावर शंका निर्माण झाली असून अशा बोगस डॉक्टरांची शहानिशा करणे गरजेचे आहे. यावर आरोग्य विभाग लक्ष पुरवतील काय, अशी जनमाणसात चर्चा होत आहे. गोरगरिबांच्या अज्ञानाचा फायदा घेत हे टोळके त्यांची फसवणूक करीत आहे. त्याबाबत प्रशासनाने दक्ष राहणे गरजेचे आहे.