शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कारप्राप्त फुलसावंगी आरोग्य केंद्र वाऱ्यावर

By admin | Updated: March 1, 2016 02:03 IST

फुलसावंगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात राबणाऱ्या हाताची महिमा राज्यात उमटली. त्यांची दखल शासनाने घेतली आहे.

निधीचा अभाव : जिल्हा आरोग्य यंत्रणेचा कारभार कारणीभूत महागाव : फुलसावंगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात राबणाऱ्या हाताची महिमा राज्यात उमटली. त्यांची दखल शासनाने घेतली आहे. राज्यपालांनी गौरव केला. मात्र आता हे प्राथिमक आरोग्य केंद्र वाऱ्यावर दिसत आहे. मागूनही निधी मिळत नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा तुघलकी कारभारच कारणीभूत असल्याचा आरोप जिल्हा परिषद वर्तुळात होत आहे. राष्ट्रीय कार्यात सदा अग्रेसर असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यात सर्वात मोठी ओपीडी काढणारे म्हणून प्रसिद्ध आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जब्बार पठाण यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरवण्यात आले. डॉक्टरांच्या सेवेचा एकीकडे पाठ थोपटून गौरव होत असताना त्यांच आरोग्य केंद्रात आवश्यक त्या सोयी सुविधा मागूनही मिळत नाही. ५० हजार नागरिकांच्या आरोग्याची नाळ याच प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडलेली आहे. आदिवासी मागास भागाचे प्रतिनिधित्व करणारे फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्र शासन दरबारी निधी मागूनही दुर्लक्षित केल्या गेले आहे.महागाव तालुक्यात सर्वात मोठे भौगोलिक कार्यक्षेत्र असलेल्या फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात दगडथर, वडद आणि बिजोरा या उपकेंद्राचा समावेश होतो. विशेष म्हणजे फुलसावंगीसह सर्व उपकेंद्र मागास आदिवासी डोंगराळ भागात आहेत. डॉ. जब्बार पठाण, डॉ. नखाते आणि कर्मचारी सेवाभावीपणे रुग्ण सेवा करीत आहेत. डॉ. जब्बार पठाण कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणारे यशस्वी डॉक्टर म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. श्रीमंत घरची मंडळी कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचा आसरा घेतात. रोज ३०० ते ४०० रुग्णांची ओपीडी येथेच नोंदली जाते. राष्ट्रीय कार्य आणि रुग्णसेवा नित्याने होत असताना या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणत्याच मूलभूत सुविधा नाहीत. जिल्हा परिषद सदस्या पंचफुलाबाई चव्हाण तसेच डॉ.बी.एन. चव्हाण यांनी फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात सोयीसुविधा पुरवण्यात याव्या म्हणून कित्येक वेळा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना गळ घातली आहे. परंतु या ना त्या कारणाने येथे मागण्यात आलेला निधी फेटाळला आहे.प्राथिमक आरोग्य केंद्रात पाणी नाही. रस्ते खराब झाले, रुग्णाला औषध साठा नाही, वॉलकंपाऊंड नसल्यामुळे आरोग्य केंद्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रुग्णाला पिण्यास पाणी नाही, या सर्व समस्या दूर करण्यासाठी डॉ.बी.एन. चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य अजूनही प्रयत्नशी आहेत. परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी त्यांच्या मागणी प्रतिसाद देत नाहीत. एकीकडे राज्यपालाने गौरवलेले प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्लक्षित केल्या जाते तर आवश्यकता नसताना अन्य प्राथमिक आरोग्य केंद्रावर लाखो रुपयांची उधळन सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)