शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

६० दिवसात ८५२ ग्रामपंचायतींच्या आॅडिटचे ‘टार्गेट’

By admin | Updated: January 23, 2016 02:27 IST

शासनाकडून दबाव वाढताच ग्रामपंचायतींचे वेगाने आॅडिट पूर्ण करण्याचा सपाटा सुरू झाला आहे.

यवतमाळ : शासनाकडून दबाव वाढताच ग्रामपंचायतींचे वेगाने आॅडिट पूर्ण करण्याचा सपाटा सुरू झाला आहे. जिल्ह्यातील तब्बल ८५२ ग्रामपंचायतींचे दोन वर्षाचे आॅडिट पूर्ण करायचे असून त्यासाठी २५ आॅडिटर्सला ६० दिवसात हे ‘दिव्य’ पार पाडायचे आहे. या आव्हानाने आॅडिटर्सचे डोके चक्रावले आहे. स्थानिक निधी लेखा विभागाचे सहायक संचालक प्रशांत डाबरे यांनी गुरुवारी दुपारी आपल्या विभागाच्या लेखा परीक्षकांची बैठक घेतली. त्यात त्यांना ६० दिवसात ८५२ ग्रामपंचायतींचे सन २०१-१४ आणि २०१४-१५ या आर्थिक वर्षातील लेखा परीक्षण पूर्ण करण्याचे आदेश दिले. २५ आॅडिटर्स, ६० दिवस आणि तब्बल ८५२ ग्रामपंचायती हे समीकरण जुळवायचे कसे याचा पेच या आॅडिटर्सपुढे निर्माण झाला आहे. स्थानिक निधी लेखा विभागाचे मुंबई येथील संचालक विधाते यांनी दिलेला आदेश डाबरे यांनी आपल्या अधिनस्त आॅडिटर्सकडे ‘फॉरवर्ड’ केला असला तरी प्रत्यक्षात ते शक्य आहे का याचे चिंतन केले जात नसल्याची खंत लोकल फंड कार्यालयातून ऐकायला मिळते. ३१ मार्चपूर्वी ग्रामपंचायतींचे आॅडिट पूर्ण करायचे असेल तर प्रत्येक आॅडिटर्सला दरदिवशी एक ग्रामपंचायत उरकावी लागेल. कमी खर्चाची लहान ग्रामपंचायतीत हे शक्य आहे. मात्र जिल्ह्यात मोठ्या ग्रामपंचायतींची संख्याच अधिक आहे. एका आॅडिटरला २५ ते ३० ग्रामपंचायतींचे आॅडिट करावे लागणार आहे. पूर्व नियोजित दौरा पाठवूनही ग्रामसेवकांचा फोन बंद असणे, वेळेवर दप्तर उपलब्ध न करून देणे, त्यासाठी टाळाटाळ करणे हे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे आॅडिटला विलंब होतो. आजही जिल्ह्यातील ८५२ ग्रामपंचायतींचे गेल्या दोन वर्षांपासून आॅडिट झाले नाही. सामान्य निधी, पाणीपुरवठा, बीआरजीएफ १३ वा वित्त आयोग, दलित वस्ती, राष्ट्रीय पेयजल अशा विविध हेडवर येणाऱ्या निधीचे आॅडिट करावे लागत असल्याने त्याला विलंब होतो. अनेक आॅडिटर्स ग्रामपंचायतीचे हे आव्हान पूर्ण करण्यासाठी आपल्या अर्जित रजांचे बलिदान देतात. अनेकदा घरी रात्री उशिरापर्यंत बसून रिपोर्ट तयार करतात. त्यानंतरही ग्रामपंचायतीचे रिपोर्ट वेळेत सादर होत नसल्याची वरिष्ठांची ओरड कायम आहे. यापूर्वी आठ ते दहा वर्षांचे ग्रामपंचायतींचे आॅडिट प्रलंबित राहत होते. आता हे अंतर दोन वर्षावर आले आहे. आॅडिट न झाल्याने गेल्या दोन वर्षात कोण्या ग्रामपंचायतीत किती गैरव्यवहार झाला ही बाब गुलदस्त्यात आहे. विशेष असे ८५२ ग्रामपंचायतीसोबत या आॅडिटर्सला नगरपंचायतींचे आॅडिट करावे लागणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)