शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मेहनत रंग लाई; झेडपी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेत मिळवले यश अन् घेतली आकाशभरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2022 15:28 IST

अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील या मुलांनी पहिल्यांदाच विमान पाहिले आणि त्यातून प्रवासही केला. या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा महादीप उपक्रमस्पर्धा परीक्षेतील टाॅप ३७ विद्यार्थ्यांची विमानवारी

यवतमाळ :जिल्हा परिषद शाळातील टॅलेंट शोधून काढण्यासाठी महादीप उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत घेतलेल्या स्पर्धा परीक्षेतील चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांतून टाॅप ठरलेल्या ३७ विद्यार्थ्यांना गुरुवारी विमानाने बंगळूरू, म्हैसूर हवाई सफर घडविण्यात आली. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील या मुलांनी पहिल्यांदाच विमान पाहिले आणि त्यातून प्रवासही केला. या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. 

तत्पूर्वी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी अंतिम फेरीत टाॅप ठरलेल्या या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि सायकल देऊन गौरविले. विमान प्रवासासाठी ४२ जणांची निवड झाली होती. त्यातील ३७ जण गुरुवारी विमानाने बंगळूरू, म्हैसूरला रवाना झाले. टाॅप ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ११ विद्यार्थी हे घाटंजी तालुक्यातील तिवसाळा गावातील असून इतर नऊ तालुक्यांतील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. विमानवारीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये २४ मुले आणि २४ मुलींचा समावेश आहे. यातील बहुतांश विद्यार्थी हे कष्टकरी कुटुंबातील असून त्यांनी विपरीत परिस्थितीत संघर्ष करीत मोठ्या कष्टाने हे यशस्वी उड्डाण घेतलेले आहे.

तिवसाळा शाळेच्या विद्यार्थ्यांनी तर स्पर्धा परीक्षेचा दीड तासाचा पेपर अवघ्या १५-२० मिनिटांत सोडवून शिक्षकांनी अवाक् केले होते. याच शाळेतील ११ विद्यार्थी टाॅप ठरले आहे. टाॅप ठरलेल्या या ११ जणांमध्ये सहा मुली आणि पाच मुलांचा समावेश आहे. याशिवाय उर्दू माध्यमाचे चार विद्यार्थी, अनुसूचित जमातीचे चार आणि एका दिव्यांग विद्यार्थ्यानेही टाॅप विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवून आपल्या गुणवत्तेची झलक दाखवून दिली. यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेने विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक गणवेशाचेही वाटप केले.

विद्यार्थी आणि पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू

टाॅप ठरलेल्या विद्यार्थ्यांंना जिल्हा परिषदेने महादीपच्या माध्यमातून ही हवाई सफर घडविली. तत्पूर्वी या विद्यार्थ्यांसह पालकांचा जिल्हा परिषदेच्या सभागृहात सायकल देवून गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगतही व्यक्त केले. शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन त्यानुसार आम्ही विद्यार्थ्यांंनी घेतलेले कष्ट यामुळेच हा गौरव मिळाल्याचे सांगत या पुढील काळातही अभ्यासू वृत्ती कायम ठेऊ, असा शब्द त्यांनी दिला.

शिक्षकांचेही कौतुक

जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी गुरुजनांचेही कौतुक केले. त्यांनी चांगली मेहनत घेत विद्यार्थ्यांकडून सराव करून घेतला, असे ते म्हणाले.

जिल्हा परिषद दरवर्षी राबविणार उपक्रम

यवतमाळ जिल्हा परिषदेच्या वतीने महादीप उपक्रम राबविण्यात आला. एवढ्यावरच ही स्पर्धा थांबणार नाही, यापुढेही ती सुरू राहील, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. या उपक्रमांतर्गत दीड तासांची स्पर्धा परीक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली होती. दोन हजारांवर जिल्हा परिषद शाळांमधील चार लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. येणाऱ्या काळात अधिकारी विद्यार्थ्यांना यात सहभागासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी पांंचाळ यांनी सांगितले.

इच्छाशक्ती महत्त्वाची

जिल्हा परिषदेच्या सभागृहात कौतुक सोहळ्यात ५० पैकी ४९ गुण मिळवित पहिला आलेल्या श्रावण अडकिने आणि मुलीतून पहिली आलेल्या पलक शेलूकार यांनी भावना व्यक्त केल्या. इच्छाशक्ती असेल तर काहीच अशक्य नाही, याची प्रचिती आल्याचे पलक या वेळी म्हणाली.

टॅग्स :Educationशिक्षणzpजिल्हा परिषदzp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीyavatmal-acयवतमाळ