शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

हंगामी वसतिगृहात शिजली २५ लाखांची खिचडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 4:38 AM

महागाव : सर्वत्र लॉकडाऊनमुळे शाळा पूर्णतः बंद असतानाही तालुक्यातील सहा हंगामी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी २५ लाखांची खिचडी शिजविण्यात आली. डिसेंबर, ...

महागाव : सर्वत्र लॉकडाऊनमुळे शाळा पूर्णतः बंद असतानाही तालुक्यातील सहा हंगामी वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी २५ लाखांची खिचडी शिजविण्यात आली. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या चार महिन्यांच्या कालावधीत हा चमत्कार घडला.

तालुक्यात गुंज, करंजी, बोरी, वेणी, कातरवाडी आणि राहूर अशा सहा ठिकाणी हंगामी वसतिगृहे आहेत. एका वसतिगृहात ९० ते १३७ विद्यार्थ्यांची उपस्थिती दर्शवून त्यांच्या रोजच्या रोज जेवणावर २५ लाख रुपये खर्च काढण्यात आला आहे. कातरवाडी, बोरी येथे पंचायत समिती सभापती अनिता चव्हाण यांनी आकस्मिक भेट दिली असता, विद्यार्थ्यांना तत्काळ बोलावून उपस्थिती दर्शविण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. संतप्त सभापतींनी गटविकास अधिकाऱ्यांना वसतिगृहाच्या चौकशीचे निर्देश दिले.

लॉकडाऊनमुळे गतवर्षीपासून शाळा पूर्णतः बंद आहेत. बाहेरगावी गेलेले मजूर पुन्हा गावातच आले आहेत. यात हंगामी वसतिगृहात विद्यार्थ्यांची उपस्थिती दर्शवून त्यांच्या नावे २५ लाखांची खिचडी स्थानिक जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापकांनी शिजविली आहे. वसतिगृहातील उपस्थिती, दिले जाणारे जेवण याची जबाबदारी मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीची आहे. प्रत्येक वसतिगृहाने प्रत्येकी चार लाखांची खिचडी शिजविल्याचे यातून दिसून येते. त्यांना हा खर्च देण्यातही आला. मात्र, अद्याप शेवटचे बिल देणे बाकी असल्याचे गटशिक्षणाधिकारी किशोर रावते

यांनी सांगितले.

बॉक्स

अनेक वसतिगृहे कागदोपत्रीच सुरू

अनेक हंगामी वसतिगृहे कागदोपत्रीच सुरू आहेत. प्रत्यक्ष भेट दिली असता, वसतिगृहात विद्यार्थीच आढळले नाहीत, असे पंचायत समिती सभापती अनिता चव्हाण यांनी सांगितले. सर्वत्र लॉकडाऊन असताना व शाळा बंद असताना हंगामी वसतिगृहात विद्यार्थी आले कसे, चार महिने विद्यार्थ्यांना जेवण दिले असेल, तर त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली का, जेवण कोणी बनवले, विद्यार्थ्यांची उपस्थिती व त्यांचे पालक खरेच बाहेरगावी गेले होते का, याची चौकशी करून शासकीय निधीचा अपहार करणाऱ्या सर्व दोषींवर फौजदारी कारवाईसाठी हा विषय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.