Next

किरीट सोमय्यांचा विश्वास नांगरे-पाटलांच्या पत्नीवर बेनामी कारखाना विकत घेतल्याचा आरोप- Kirit Somaiya

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 01:56 PM2021-11-23T13:56:15+5:302021-11-23T13:56:33+5:30

विश्वास नांगरे-पाटील यांनी एक बेनामी कारखाना विकत घेतल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केलाय. मुंबईचे जॉईंट कमिशनर विश्वास नांगरे-पाटलांना पोलीस दलातून मुक्त केलं पाहिजे अशी मागणीही किरीट सोमय्यांनी केलीय. शिवसेनेचे नेते माजी मंत्री अर्जुन खोतकरांनी जालन्यातील रामनगर साखर कारखाना बेनामी पद्धतीने विकत घेत तब्बल १०० कोटींचा घोटाळा केला, असा गंभीर आरोप सोमय्यांनी केला. या जालना साखर कारखान्याच्या शेअर होल्डर्समध्ये रुपाली विश्वास नांगरे-पाटील यांचे नाव आहे. नांगरे-पाटलांचे सासरे मुळे हे देखील शेअर होल्डर आहेत. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करा आणि तोपर्यंत विश्वास नांगरे-पाटलांना पोलीस दलातून मुक्त करा. असं किरीट सोमय्यानी म्हटलंय..